अनिवासी भारतीयांनी पाठवले 11.60 लाख कोटी; अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूरमधून पैसे आले दुप्पट

अनिवासी भारतीयांनी पाठवले 11.60 लाख कोटी; अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूरमधून पैसे आले दुप्पट

विदेशात काम करून भारतात पैसे पाठवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विदेशात डॉलरमध्ये पगार मिळत असल्याने लाखो रुपयांची कमाई होत आहे. परदेशात राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांनी 2024-25 या आर्थिक वर्षात जवळपास 11.60 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. ही रक्कम गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढली आहे. आरबीआयने नुकतीच यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे.

हिंदुस्थानातील लोक जगातील वेगवेगळ्या देशांत काम करत असून गेल्या दशकभराच्या काळात जगातील सर्वात जास्त रेमिटन्स मिळवण्यात हिंदुस्थान देश अव्वल ठरला आहे. ज्या देशात हिंदुस्थानी लोक राहून पैसे पाठवतात, त्यामध्ये सर्वात जास्त अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूर या तीन देशांचा समावेश आहे. याआधी आखाती देश म्हणजेच सौदी अरब, यूएई, कुवेत आणि कतार यांचा समावेश होता. या ठिकाणाहून भारतात सर्वात जास्त पैसे पाठवले जात होते, परंतु आता या देशांच्या तुलनेत अमेरिका, ब्रिटनचा वाटा वाढला आहे. या देशांत आता कुशल व्यावसायिकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या ठिकाणी लोक आयटी, इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करत आहेत.

केरळ, तामीळनाडू, पंजाब आघाडीवर

भारतात ज्या राज्यांतून लोक कामासाठी परदेशात गेले आहेत, त्यामध्ये केरळ, तामीळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. केरळमध्ये सर्वात जास्त पैसा विदेशातून पाठवला जातो. या पैशांतून कुटुंबाच्या गरजा, मुलांचे शिक्षण, नवीन घरे बांधणे, छोटे व्यवसाय करणे यासाठी केला जातो. देशाची व्यापार तूट करण्यामध्ये रेमिटन्सची मोठी भूमिका आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळी अधिवेशन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात रणकंदन, विरोधकांचा सभात्याग पावसाळी अधिवेशन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात रणकंदन, विरोधकांचा सभात्याग
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाचे सदस्य आज सलग दुसऱ्या दिवशी कमालीचे आक्रमक झाले होते. तीन महिन्यांत राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या....
गोव्यातही भाजप सरकारने मराठीचे पंख कापले; पाच वर्षांत 50  मराठी शाळांना टाळे, मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात चिंता
‘पीक अवर्स’ला बिनधास्त प्रवाशांकडून दुप्पट भाडे घ्या! मोदी सरकारने कॅब कंपन्यांना दिली मुभा
अमेरिका, इस्रायलचे टेन्शन वाढले; इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी संबंध तोडले, राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांचा मोठा निर्णय
महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा
यशवंतराव चव्हाण यांची पणती 11व्या वर्षी बनली लेखिका; अमायरा चव्हाणच्या ‘द ट्रेल डायरीज’चे 5 जुलैला प्रकाशन
कोरोना लस आणि हृदयविकाराचा संबंध नाही; केंद्राच्या अहवालातून उघड