चेंबूरच्या प्रदूषणकारी ‘आरएमसी’ प्लांटमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका! तातडीने प्लांट बंद करण्याची मागणी

चेंबूरच्या प्रदूषणकारी ‘आरएमसी’ प्लांटमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका! तातडीने प्लांट बंद करण्याची मागणी

मुंबई महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून चेंबूरच्या प्रकाशनगर आणि प्रयागनगर येथे सुरू असलेल्या प्रदूषणकारी ‘आरएमसी’ प्लांटमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरी वस्तीत असलेल्या या प्लांटमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा प्लांट तातडीने रद्द करावा अशी मागणी शिवसेना, नागरिकांकडून करण्यात आली आहे.

आरोग्याला धोकादायक असणारा प्रभाग क्रमांक 148 मधील अमित इन्फ्रा प्रा. लि. कंपनीचा आरएमसी प्लांट 2017 साली शिवसेनेने बंद पाडला होता. मात्र, आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिल्याचे सांगत मेसर्स गेनॉन नॉर्टन इंजिनीअरिंग या कंपनीने नागरी वस्तीत पुन्हा आरएमसी प्लांट उभारला. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनीही हा प्लांट या ठिकाणी होऊ नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. दरम्यान, हा प्लांट तातडीने रद्द करावा, अन्यथा जोरदार आंदोलनाचा इशारा शिवसेनेने मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. 

नियम धाब्यावर

नागरी वस्तीत 500 मीटर अंतराच्या आत असा प्रदूषणकारी, रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण करणारा प्लांट उभारता येत नाही. तरीही पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून आरएमसी प्लांट उभारला आहे. त्यामुळे याची परवानगी तत्काळ रद्द करून हा प्लांट रद्द करावा, अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे, माजी नगरसेविका निधी शिंदे, दक्षता पाताडे यांच्यासह रहिवाशांनी केली आहे.

आधी जनसुनावणी घ्या!

हा संपूर्ण परिसर हा नागरी वस्तीचा आहे. त्यामुळे इथे प्लांट उभारला तर त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागतील. याबाबत रहिवाशांची भूमिका समजून घेण्यासाठी जनसुनावणी घ्यावी अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?