पाकड्यांना माणुसकी नाही, संकटात अडकलेल्या विमानाला लॅंडिंगची परवानगी नाकारली

पाकड्यांना माणुसकी नाही, संकटात अडकलेल्या विमानाला लॅंडिंगची परवानगी नाकारली

दिल्लीहून श्रीनगरला 21 मे रोजी जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला गारपिटीमुळे विमानामध्ये तणावाची आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी हिंदुस्थानने पाकिस्तानकडे त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पाकिस्तानने नकार दिला. वृत्तसंस्था पीटीआयने 22 मे रोजी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, इंडिगोचे विमान अमृतसरवरून जात असताना पायलटला थोडासा गोंधळ जाणवला. त्याने लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) शी संपर्क साधला आणि खराब हवामान टाळण्यासाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी मागितली.

लाहोर एटीसीने पायलटला स्पष्टपणे नकार दिला. यामुळे विमानाला त्याच्या नियोजित मार्गावर पुढे जावे लागले. नंतर विमानाला प्रचंड गोंधळाचा सामना करावा लागला. विमान हादरू लागले, या विमानात जवळपास 227 प्रवासी होते. पायलटने श्रीनगर एटीसीला माहिती दिली आणि विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले. लँडिंगनंतर असे दिसून आले की,  विमानाचा पुढचा भाग (नोज कोन) तुटलेला होता. विमानाच्या आतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये लोक त्यांच्या जीवनासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. मुलांच्या रडण्याचे आवाजही येत आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केले. 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26  जणांचा मृत्यू झाल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. 24 एप्रिल रोजी पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. हिंदुस्थानने देखील पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्रही बंद केले आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) नियमांनुसार, कोणताही देश दुसऱ्या देशासाठी आपले हवाई क्षेत्र एका महिन्यापेक्षा जास्त काळ बंद करू शकत नाही. अशा परिस्थितीत, पाकिस्तान आपले हवाई क्षेत्र भारतीय विमान कंपन्यांसाठी 23 मे पर्यंत बंद ठेवू शकतो.

विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या 5 नेत्यांचे एक शिष्टमंडळही प्रवास करत होते. त्यांच्यापैकी एक असलेल्या टीएमसी खासदार सागरिका घोष म्हणाल्या, ‘मला वाटले की मृत्यू जवळ आला आहे. आयुष्य संपले. लोक ओरडत होते आणि प्रार्थना करत होते. आमच्या सर्वांचे प्राण वाचवणाऱ्या पायलटला सलाम. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, श्रीनगरमध्ये उतरण्यापूर्वी सुमारे 20-30 मिनिटे आधी सीट बेल्ट बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी विमानात खूपच धक्के जाणवले. घोषणा झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटांतच विमान इतके जोरात हादरले की, सर्वांना वाटले की हे आपले शेवटचे उड्डाण असेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे,  अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू...
‘रात्री 8 वाजता मी दारूची बाटली उघडते अन्…’ गोविंदाची पत्नी सुनिता दारूसाठी वेडी का आहे? तिनेच सांगितलं कारण
Hair Care- केस गळतीमुळे त्रस्त आहात का? या सहा उपायांनी तुमच्या केसांना द्या नवसंजीवनी
Vaishnavi Hagavane case – राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
Nanded News – गाडीवर पोलीस व पत्रकार बोर्ड लावून गोवंश चोरी करण्याचा प्रयत्न; सहा जणांना अटक
आरक्षित सरकारी जमीन राहू-केतूंनी हडपली! हिंमत असेल तर आव्हान स्वीकारा; अनिल गोटेंचा मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंना इशारा
हिंदुस्थानात कोरोना रुग्णांचा आकडा चढाच! महाराष्ट्रात 100 नव्या रुग्णांची नोंद