‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या…’, ऑपरेशन सिंदूरबाबत पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

युद्धबंदीच्या घोषणेनंतर विरोधकांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण यांनी या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत मोठी मागणी केली आहे. युद्धबंदीनंतर ज्या घटना घडल्या त्या वाईट आहेत, सोशल मीडियावर धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या, मोदी प्रेमी मिडीयावर कारवाई किंवा दंड झाला पाहिजे अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

युद्धबंदीनंतर ज्या घटना घडल्या त्या वाईट आहेत. सोशल मीडियावर धादांत खोट्या बातम्या दिल्या गेल्या, मोदी प्रेमी मीडियावर कारवाई किंवा दंड झाला पाहिजे, खोट्या बातम्या देण्यात आल्या, त्यामुळे जगभारत आपलं हसू झालं. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं आहे, त्यांना निलंबित करा अशी मागणीही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, युद्धबंदीनंतर ज्या घटना घडल्या त्या वाईट आहेत, योग्य ती माहिती दिली जात नाहीये,  त्यामुळे आमची मागणी आहे की योग्य ती माहिती द्यायला हवी आणि संसदेत विशेष सत्र ऑपरेशन सिंदूर नंतर बोलवायला हवं होतं. मी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलरशी केली नाही, पण हिटलरच्या काळामध्ये जशी एकाधिकारशाई होती तसंच देशात, राज्यात  घडत आहे.

राज्यात गुन्हेगारीनं कळस गाठला आहे, बीडमध्ये सर्रास गुन्हेगारीच्या घटना सुरू आहेत. यावर कुणाचा अंकुश नाहीये, त्यामुळे राज्य वाऱ्यावर सोडले का? असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे, मध्य प्रदेशचे मंत्री विजयशाह यांनी जे वक्तव्य केलं, ते अतिशय चुकीचं आहे. त्याची जितकी निंदा करावी तेवढी कमी आहे,  तातडीने त्यांचा राजीनामा मोदी सरकारने घ्यायला हवा होता, पण तसं होताना दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. त्यातच आता हे युद्ध थांबवल्याबाबत नोबेल पारितोषिक मिळावे,...
शिंदेंची ओळख लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचा सणसणीत टोला, अमित शहांवरही घणाघात
चंद्रपूर जिल्ह्यात 49 हजार हेक्टरवरच पेरणी, पावसाचा पत्ता नाही; कापूस सोयाबीन लागवडीचे वेळापत्रकच बिघडले
Iran Earthquake- इस्रायलचा हल्ला की इराणची अणुचाचणी? भूकंप नेमका कशामुळे झाला, तर्कवितर्क सुरू
एअर इंडियाच्या विमान अपघाताचं गूढ उकलेना; 9 कोटी खर्च करून उभारलेल्या लॅबमध्ये ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटाच रिकव्हर होईना
इंटेल कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार, आधीच नोकऱ्यांची बोंबाबोंब, त्यात कर्मचारी कपात
हिंदुस्थानात बनवणार फाल्कन 2000 जेट, मेक इन इंडिया मोहिमेला पाठबळ