राज ठाकरेंबाबतची खंत काय? संजय राऊत यांनी बोलून दाखवली मनातली सल

राज ठाकरेंबाबतची खंत काय? संजय राऊत यांनी बोलून दाखवली मनातली सल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहीलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलं आह. याच पुस्तकात राऊतांनी अनेक गौप्यसफोट केले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा दावाही राऊतांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी संवाद साधाताना राऊतांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. मी 100 दिवस तुरूंगात होते, तेथील एकूण अनुभवाबद्दल लिहील्याचं राऊतांनी सांगितलं.यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलची एक सल देखील बोलून दाखवली.

मी तुरूंगात होतो, तेव्हा राज ठाकरेंनी एकदा फोन करायला हवा होता, असं राऊत म्हणाले. राज ठाकरे माझे मित्र होते. आमचे चांगले संबंध होते. राजकारण वेगळं असलं तरी अशावेळी घरच्यांना, कुटुंबाला दिलासा देणारा फोन जरी गेला तरी एक आधार वाटतो, की आपल्यासोबत कोणी तरी आहे. ज्या पद्धतीने आमच्यावर संकटाचा पहाड कोसळला होता, व्यक्तीश: नाही, कुटुंबावर. तेव्हा एक काडीचा आधार असतो. कुणी तरी फुंकर मारणं महत्त्वाची असते,तेव्हा राज ठाकरे यांनी एक फोन तरी करायला हवा होता असं म्हणत राऊत यांनी मनातील सल बोलून दाखवली.

मला जास्त बोलायला लावू नका

बाळासाहेब हे हिंदूहृदय सम्राट होते. न्यायामूर्ती, पंतप्रधान आणि राष्ट्रपती या सर्वांशी त्यांचे आदराचे संबंध होते. बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हा तरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची. बाळासाहेब बोलणं हा प्रसाद आहे, असं ते मानायचे. माझ्या मर्यादेत जेवढं शक्य आहे, तेवढी माहिती मी दिली. मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा राऊत यांनी दिला.

हेही वाचा :  Sanjay Raut : अडचणीच्या काळात ज्यांना मदत केली, त्यांनीच बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला – संजय राऊतांचा पुन्हा घणाघाती आरोप

बाळासाहेबांचा पक्ष लोफरच्या हातात

ठाकरे कुटुंबाने, मातोश्रीने मोदी-शहांवर एवढे उपकार केले. त्यांनी आमचा पक्ष फोडला याचं काही वाटत नाही. आमदार फुटले, गद्दार झाले. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणाच्या हातात दिली? तर एका लोफर माणसाच्या हाती दिली असं म्हणत राऊतांनी थेट हल्ला चढवला. शिंदेंचं राजकारण त्यांच्यापाशी. पण त्यांना तुम्ही शिवसेनेचे मालक कसे बनवू शकता? तुम्ही कोण आहात? असा सवालही त्यांन विचारला. ज्या बाळासाहेबांनी किंवा ज्या शरद पवारांनी त्यांना चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली, त्यांचे पक्ष लोफर लोकांच्या हातात दिले, हे त्यांना शोभलं नाही. त्यामुळे चिडून मी लहानसा संदर्भ दिला. मी या विषयावर कधी बोललो नाही. लिहिलं नाही. उद्धव ठाकरेही कधी बोलले नाही. काही गोष्ट गोपनीय असतात. आम्ही कधीच बोललो नाही. या कानाचं त्या कानाला कधी गेलं नाही. पण त्या ओघात हा प्रसंग गेला असं राऊत यांनी स्प्ष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल