बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल

वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज-1 मधील घरे तयार आहेत. मात्र अद्याप रहिवाशांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना पत्र लिहून रहिवासांना घरांचा ताबा कधी देणार असा सवाल केला आहे.

”वरळी येथील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 मधील तयार झालेल्या घरांचा ताबा रहिवाशांना देण्यासाठी विलंब का होतोय? याचा जाब महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल जी यांच्याकडे पत्राद्वारे मागितला”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटसोबत त्यांनी म्हाडाला पाठवलेले पत्रही शेअर केले आहे. या पत्रात त्यांनी घराचा ताबा कधी देणार असा सवाल केला आहे तसेच त्याबाबतची अधिकृत माहिती लवकरात लवकर रहिवाशांना द्यावी, अशी विनंती केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाणी पिऊनही घसा कोरडाच राहतो? सतत तहान लागण्यामागे असू शकते हे कारण पाणी पिऊनही घसा कोरडाच राहतो? सतत तहान लागण्यामागे असू शकते हे कारण
उन्हाळ्यात तहान लागणं हे साहजिक आहे. घाम, उष्णता या सगळ्यामुळे शरीरातल्या पाण्याची पातळी कमी होते आणि ते भरून काढण्यासाठी शरीर...
सरन्यायधीश भूषण गवई यांचा पहिल्याचा खटल्यात नारायण राणेंना दणका, वनविभागाची जमीन बिल्डरला देण्याच्या निर्णय केला रद्द
न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..
लग्न, फसवणुक आणि षडयंत्र; इंटीमेट सीन्सचा भडीमार आहे या सिनेमांमध्ये
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल
रिसॉर्टमधील तंबू कोसळून पर्यटक तरुणीचा मृत्यू, तीन जण जखमी