India Pakistan War – 32 विमानतळांवरील उड्डाणे बंद

India Pakistan War – 32 विमानतळांवरील उड्डाणे बंद

हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाने 9 मे 2025 पासून ते 15 मे 2025 च्या पहाटे 5.30 पर्यंत उत्तर आणि पश्चिम हिंदुस्थानातील तब्बल 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणे बंद करण्याचा निर्णय जारी केला आहे.

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सीमेवरील भागात हाय अलर्ट जारी करण्यता आला आहे. त्यामुळे श्रीनगर, अमृतसर, जम्मू,  लेह, चंदिगड, जोधपूर, भूज, जामनगर, जैसलमेर आणि बिकानेर यांसारख्या प्रमुख विमानतळांसह 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणसेवा बंद करण्यात आली आहे.

पंजाबमधील काही भागांत ब्लॅकआऊट

पंजाबच्या फिरोजपूर, बर्नाला, पठाणकोट आणि इतर सीमावर्ती भागात आज सायंकाळी ब्लॅकआऊट करण्यात आला. तसेच फिरोजपूरमध्ये 8 वाजून 40 मिनिटांनी ब्लॅकआऊट करण्यात आला. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवा पसरवू नये आणि सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन करतानाच सावधगिरीचा उपाय म्हणून ब्लॅकआऊट करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

ड्रगनची दर्पोक्ती, आम्ही पाकिस्तानसोबत

आम्ही पाकिस्तानसोबत असल्याची घोषणा चीनने केली आहे. सार्वभौमत्व, क्षेत्रीय अखंडता आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही पाकिस्तानसोबत उभे असल्याचे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले आहे. वांग यी यांनी आज पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्यासोबत पह्नवरून चर्चा केली. त्यानंतर वांग यी यांनी चीनचा निर्णय जाहीर केला.

बंदमध्ये या विमानतळांचा समावेश

अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भूज, बिकानेर, चंदिगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुलू-मनालीतील भुंतर, लेह, लुधियाना, मुंद्रा, नालिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोटचे हिरासर, सरसावा, शिमला, श्रीनगर, थोइसे, उत्तरलाई. दिल्ली आणि मुंबई या विमानतळांवरील नागरी उड्डाणसेवा बंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम हल्ल्यानंतरच नौदल युद्ध तयारीसह समुद्रात उतरले होते – व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद पहलगाम हल्ल्यानंतरच नौदल युद्ध तयारीसह समुद्रात उतरले होते – व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद
पहलगाम हल्ल्यानंतरच नौदल युद्ध तयारीसह समुद्रात उतरले होते, अशी माहिती व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद यांनी दिली. रविवारी हिंदुस्थानच्या तिन्ही...
LOC वर पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक ठार; सर्व हिंदुस्थानी पायलट सुरक्षित; सैन्यदलांच्या प्रमुखांनी दिली माहिती
ceasefire : ‘तुमचे रणगाडे, प्लेन, मिसाईल हे खपवण्याकरता…,’ काय म्हणाले उदयनराजे भोसले ?
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा, सैन्यदलांच्या प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती
स्मिता पाटीलचा लेक ‘गे’ आहे? बॉलिवूडमध्ये होती चर्चा, अनेकांनी केलं प्रपोज; सत्य काय?
रेखा किंवा जया बच्चन नाही… अमिताभ बच्चन यांनी या बॉलिवूड अभिनेत्रीसाठी पाठवले होते ट्रक भरून गुलाब
बाथटबमध्ये उतरली 25 वर्षीय अभिनेत्री, बिना कपडे हिरोसोबत दिसली; इंटरनेटवर खळबळ