‘हे काही टीव्ही शो नाही..’; पहलगाम हल्ल्यानंतरच्या मुलाखतींवरून भडकली मराठी अभिनेत्री

‘हे काही टीव्ही शो नाही..’; पहलगाम हल्ल्यानंतरच्या मुलाखतींवरून भडकली मराठी अभिनेत्री

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया सातत्याने माध्यमांसमोर दाखवले जात आहेत. काही कुटुंबीयांच्या मुलाखती घेतल्या गेल्या, तिथे नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांच्याशी वारंवार मुलाखतींसाठी बोलणं, त्यांना तेच तेच प्रश्न विचारणं आणि सतत तेच तेच दाखवणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल अभिनेत्री शिवानी सुर्वेनं केला आहे. शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याविषयीची पोस्ट लिहिली आहे.

शिवानी सुर्वेची पोस्ट-

‘लोकांनी, विशेषत: मीडियाने थोडा विचार करावा. सतत पीडितांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे इंटरव्ह्यू घेणं, पुन्हा पुन्हा तेच विचारणं, एकामागोमाग एक सोलो इंटरव्ह्यू पोस्ट करणं.. हे थांबवलं पाहिजे. हे काही टीव्ही शो नाहीये. हे एखाद्या चॅनलचं टीआरपी वाढवण्याचं साधन नाही. मीडियाने थोडं शहाणपण वापरावं. ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे, त्यांना शांतपणे श्वास घेऊ द्या. त्यांच्या आयुष्यात जे घडलंय, ते फार वेदनादायक आहे. आपण त्यांच्या दु:खाचा सन्मान केला पाहिजे, त्यांना त्रास देणं बंद केलं पाहिजे’

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. एप्रिल आणि मे महिन्यात काश्मीरला असंख्य पर्यटक फिरायला जातात. ऐन पर्यटनाच्या काळात दहशतवादी हल्ला झाल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना लक्ष्य केल्याचीही बाब समोर आली आहे. पहलगाममधील बैसरन या पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरलं. हिंदू आहेस की मुस्लीम.. कलमा वाचून दाखव.. असं विचारून केवळ हिंदूंवर त्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. बैसरन पठारावर फक्त चालत किंवा पोनी राइडनेच पोहोचता येत असल्याने त्याठिकाणी मदत पोहोचायलाही उशीर लागला. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दहशतवाद्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशवासियांकडून होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;