Tiger Deaths धक्कादायक! व्याघ्र मृत्यूत महाराष्ट्र अव्वल, चार महिन्यांत 20 वाघांचा मृत्यू

Tiger Deaths धक्कादायक! व्याघ्र मृत्यूत महाराष्ट्र अव्वल, चार महिन्यांत 20 वाघांचा मृत्यू

एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. देशात मागील चार महिन्यांत 62 वाघांचा मृत्यू झाला. त्यातील 20 वाघ हे केवळ एकट्या महाराष्ट्रातील आहेत. परिणामी व्याघ्र मृत्यूत देशात महाराष्ट्र अव्वल ठरला तर 17 वाघांच्या मृत्यूने मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

देशभरात 2022च्या व्याघ्रगणनेनुसार देशात 3 हजार 167 वाघांची नोंद झालेली आहे. या व्याघ्रगणनेत महाराष्ट्राचाही वाटा मोठा होता. राज्यात 2018 मध्ये 312 वाघांची नोंद झाली होती, तर 2022 मध्ये त्यात मोठी वाढ होत ती संख्या 444 वर पोहचली. पण व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात मात्र व्याघ्र मृत्यूची संख्याही मोठी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जानेवारी 2025 पासून 26 एप्रिलपर्यंतच्या चार महिन्यांत देशात 62 व्याघ्रमृत्यू झालेले आहेत. हे मृत्यू वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरीत्या अशा विविध कारणांनी झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 20 मृत्यू झाले आहेत. बहेलिया आणि बावरिया यासह विविध टोळ्यांकडून मागील 5 वर्षात देशभरात तब्बल 100 हून जास्त वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्याची माहिती अलीकडेच समोर आली होती. त्यात दरवर्षी मोठी वाढ दिसून आली आहे. एक संघटित गुन्हेगारी ‘सिंडिकेट’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून वाघांचे अवयव भारतातील विविध भागातून पुरवले जात असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

मागील पाच वर्षांतील मृत्यू

2020 – 116
2021 —127
2022 —121
2023 —178
2024– 124

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले… भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले…
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले,...
गोविंदाचे घर आतून एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही, बार सेक्शन ते बेडरूम फारच सुंदर इंटेरिअर, प्रत्येक कोपरा वास्तुनुसार बांधलेला
heart attack: महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतोय? जाणून घ्या तज्ञांचे मत…
मोदी समर्थकांनी विक्रम मिसरी यांना केलं ट्रोल, कुटुंबातील महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी
पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचाच आणि तो आम्हाला परत मिळालाच पाहिजे; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
पाकिस्तान स्वतः लढत नाही, तो दहशतवाद्यांना पुढे करतो – मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला – हर्षवर्धन सपकाळ