Iran Blast – इराणमधील राजाई बंदरात भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू; 500 हून अधिक जण जखमी

Iran Blast – इराणमधील राजाई बंदरात भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू; 500 हून अधिक जण जखमी

इराणच्या बंदरगाहमध्ये राजाई बंदरात शनिवारी भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर बंदरात आग लागली. या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला असून 516 जण जखमी झाले आहेत. इराणच्या राष्ट्रीय आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते बाबक यक्तपरस्त यांनी दुर्घटनेची पुष्टी केली. जखमींना उपचारासाठी विविध दाखल करण्यात आले आहे.

राजाई बंदरातील कंटेनरमुळे हा स्फोट झाल्याचे प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मेहरदाद हसनजादेह यांनी सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात येत आहे.

राजाई बंदरातून प्रामुख्याने कंटेनर ट्रॅफिक कंट्रोल केले जाते. बंदरात तेलाच्या टाक्या आणि पेट्रोकेमिकल युनिट्स असल्याने आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. या स्फोटामुळे प्रादेशिक व्यापार आणि पुरवठा साखळीवरही मोठा परिणाम झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेजुरीच्या खंडोबाला एक हजार किलो डाळिंबाची सजावट जेजुरीच्या खंडोबाला एक हजार किलो डाळिंबाची सजावट
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात वैशाख पौर्णिमेनिमित्त एक हजार किलो डाळिंब वापरून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सध्या...
नॅशनल पार्कमधील रहिवाशांची बाजू ऐकून घ्या! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात अपयश; बांगलादेशी महिलेला हायकोर्टाकडून जामीन
जुलैमध्ये म्हाडाची चार हजार घरांसाठी लॉटरी; ठाणे, कल्याणमध्ये सर्वाधिक घरे
सायबरची कारवाई; सोशल मीडियावरील पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या
…अन्यथा आरटीओच्या चेकपोस्ट अदानींच्या ताब्यात जाणार; मालमत्ता वाचवण्यासाठी परिवहन विभागाची सरकारकडे 504 कोटींची मागणी
आता कुरापत काढाल तर तडाखा देऊ! तिन्ही दलांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानला ठणकावले