मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवू पाहत आहेत? मंगेशकर रुग्णालयप्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवू पाहत आहेत? मंगेशकर रुग्णालयप्रकरणी आदित्य ठाकरे यांचा सवाल

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्या गरोदर महिलेकडे खंडणी मागितली असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार उद्धव बाळसाहेब ठाकरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवू पाहत आहेत? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गरोदर महिलेकडे 10 लाख रुपये मागितले. त्या महिलेला ही खंडणी देता आली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रुग्णालयावर कारवाई करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पण त्यापूर्वी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या रुग्णालयाच्या अंतर्गत समितीने पैसे मागितलेच नसल्याचे म्हटले आहे. तर काल झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी पैसे मागितल्याचे म्हटले आहे आणि त्या डॉक्टरांनी राजीनामा दिल्याचेही सांगितले. स्वतःला वाचवण्यासाठी विरोधाभासी विधानं करणाऱ्या रुग्णालयावर पुणेकर कसा काय विश्वास ठेवू शकतात? असे आदित्य ठाकरे म्हणाले.

जर रुग्णालय अशी खंडणी मागत असेल तर त्यांनी जो मालमत्ता कर भरलेला नाही जो कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे त्याचे काय? तपाससंस्था त्या रुग्णालय चालवणाऱ्यांच्या आणि ट्रस्टींच्या घरात तपासासाठी जाणार का? हे रुग्णालय कोण चालवतंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवू पाहत आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालने 24 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबीयांकडूनच याबाबतची माहिती सांगण्यात आली. पण तिच्या मृत्यूचे...
पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी
‘लग्नानंतर माझी रात्रीची झोप उडाली होती’, माधुरी दीक्षिने सांगितला डॉ. नेनेंसोबतचा लग्नानंतरचा अनुभव
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश
Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदचा लाहोरमधील सिक्रेट ठिकाणा उघड!