चाकण:टेपचा जोरात आवाज का केला म्हणून चौघांची रिक्षाचालकाला मारहाण
रिक्षात टेपचा जोरात आवाज का केला आहे, तु आम्हाला ओळखतो का’, अशी आरोपी चौघांनी फिर्यादीला विचारणा केली. फिर्यादी यांनी त्यांना काय झाले? असे विचारले. त्या कारणावरून चिडुन जात आरोपी चौघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
पिंपरी: ‘रिक्षात टेपचा जोरात आवाज का केला आहे, तु आम्हाला ओळखतो का’, अशी आरोपी चौघांनी फिर्यादीला विचारणा केली. फिर्यादी यांनी त्यांना काय झाले? असे विचारले. त्या कारणावरून चिडुन जात आरोपी चौघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
तेवढ्यात आरोपी क्र. १ याने तेथे पडलेला फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोक्यास, कपाळावर मारुन त्यांना जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २) रोजी रात्री ८.०० वाजता शिवाजी विद्यालय, मांजरे स्टिल दुकानाजवळ, चाकण येथे घडली.
फिर्यादी रिक्षाचालक जीवन विक्रम जाधव यांनी आरोपी १) अमोल विश्वनाथ लाटकर (वय २७ वर्षे रा एकतानगर चाकण), २) पराग बबन गायकवाड (वय २० वर्षे रा खंडोबामाळ, चाकण), ३) विवेक कु-हाडे, ४) विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ७०२/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ व २ यांना अटक केली आहे. पोना चव्हाण तपास करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List