सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त

सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त

महाराष्ट्राला परतीच्या पावसाने मोठा फटका दिला. मराठवाड्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीने शेतजमिनीच पाहून गेल्या आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसून शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. आता सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. अकोला येथील शेतकऱ्यांनी 5,8, 13 रुपये अशी मदत करण्यात आली आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले, शेतकऱ्यांना मदत मिळणे दूरच उलट प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांची अहवेलना करण्यात आली आहे. अकोला येथील शेतकऱ्यांना ५ रुपये, ८ रुपये, १३ रुपये अशी मदत करण्यात आली आहे. याला जखमेवर तिखट चोळणे म्हणतात. एकीकडे हातातील पीक केलं, जे आहे त्या शेतमालाला भाव मिळत नाही जे नुकसान झालं त्याचा विमा असा पाच रुपये मिळणार असेल तर शेतकरी जगणार कसा? शेतकऱ्यांना मदत सोडा पण त्यांचा असा अपमान करू नका, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी करतात असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मत चोरी म्हणजे सामान्य मतदाराचा अपमान...
Ratnagiri News – कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी पंचक्रोशीत भात शेतीचे प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर
Photo – पवईमध्ये थरारक ओलीसनाट्य आणि एन्काउंटर
Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप
IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला, टीम इंडियाला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 339 धावांचं आव्हान