वाघ-मानव संघर्ष पेटला;  चंद्रपुरात दोन महिन्यांत अकरा जणांचा बळी

वाघ-मानव संघर्ष पेटला;  चंद्रपुरात दोन महिन्यांत अकरा जणांचा बळी

चंद्रपूर जिह्यात वाघ आणि मानव संघर्ष पेटला असून गेल्या दोन महिन्यांत वाघाने अकरा जणांच्या नरडीचा घोट घेतला आहे. सतत घडणाऱया या घटनांनी जंगलात असलेली गावे दहशतीत आली असून या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. वन्य जिवांचे संरक्षण व्हायला हवे, पण माणसांच्या संरक्षणाचे काय? असा सवाल उपस्थित केला जातोय.

चंद्रपूर जिह्यात वाघांची संख्या वाढल्याने वाघ आता गावाकडे वळू लागले. जंगलालगत असलेल्या गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. लोकांना शेती आणि सरपण आणण्यासाठी जंगलात जाणे अवघड झाले आहे. जिह्यात सुमारे अडीचशेच्या वर वाघ आहेत. यातील पन्नास वाघ ताडोबा प्रकल्पात, तर इतर आरक्षित जंगलात आहेत. आता ताडोबातील वाघही बाहेर पडू लागले आहेत. संरक्षित जंगल आणि गावाजवळच्या सुरक्षित ठिकाणी वाघ आसरा घेऊ लागलेत. यातूनच वाघ आणि मानव संघर्ष वाढू लागलाय. यावर कायमस्वरूपी तोडगा अजूनही निघालेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले तर अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ही यावर सरकारी प्रयत्नांची गरज व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी करतात असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मत चोरी म्हणजे सामान्य मतदाराचा अपमान...
Ratnagiri News – कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी पंचक्रोशीत भात शेतीचे प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर
Photo – पवईमध्ये थरारक ओलीसनाट्य आणि एन्काउंटर
Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप
IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला, टीम इंडियाला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 339 धावांचं आव्हान