हातकणंगले भूमिअभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या, चौपट नुकसानभरपाईसाठी मोजणी प्रक्रिया बंद पाडली

हातकणंगले भूमिअभिलेख कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या, चौपट नुकसानभरपाईसाठी मोजणी प्रक्रिया बंद पाडली

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील चोकाक ते अंकलीदरम्यान चोकाक, अतिग्रे, हातकणंगले, मजले, माणगाववाडी हद्दीतील महामार्गासाठी बाधित जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी होणार होती. मात्र, बाधित शेतकरी, व्यापारी यांनी बाधित जमिनीची चौपट नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकरी व व्यापारी यांनी भूमीअभिलेख कार्यालय हातकणंगले येथे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत चौपट भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत बाधित जमिनीची मोजणी करू न देण्याची आक्रमक भूमिका घेत कार्यालयासमोरच ठिय्या मांडला. गेल्या दोन वर्षांपासून महामार्गाचे कामकाज ठप्प झाल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाधीत शेतकऱयांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. प्राधिकरणाचे कर्मचारी दमदाटीची भाषा करत असून, ऐन दिवाळीतच बाधित शेतकऱ्यांना नोटीसा दिल्या गेल्या; पण अतिग्रे गावातील एकाही बाधित शेतकऱ्याला नोटीस मिळाली नाही. मात्र, प्राधिकरणचे कर्मचारी अंधाधुंद कारभार करत दांडगाव्याने मोजणी करत असल्याचा आरोप शेतकऱयांनी केला.

गेल्या दोन वर्षांपासून हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील 10 गावांतील बाधित शेतकऱ्यांना चौपट नुकसानभरपाई मिळावी, यासाठी लढा सुरू आहे. मात्र, यावर अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही. त्यातच आज प्राधिकरण व भूमिअभीलेख यांच्या वतीने बाधित जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येणार होती. त्याला विरोध म्हणून चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले या पाच गावांतील शेतकऱयांनी त्याला विरोध केला. उपजिल्हाधिकारी भूसंपादन रूपाली चौगुले यांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे शेतकरी व प्रशासन यांची बैठक संपन्न झाली. मात्र, जोपर्यंत चौपट नुकसानभरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत मोजणी करू नये, या भूमिकेवर शेतकरी ठाम राहिले त्यामुळे बैठक निष्फळ ठरली. यावेळी विक्रम पाटील, दिपक वाडकर, अभिजित इंगवले, सुरेश खोत, अमीत पाटील, मिलिंद चौगुले, अजित रणावरे, गोमटेश पाटील, विजय पाटोळे यांच्यासह बाधित शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

आम्ही सर्व शेतकरी जमिनी द्यायला तयार आहोत. मात्र, चौपट नुकसानभरपाईबाबत गेल्या दोन वर्षांत निर्णय झालेला नाही. त्यातच प्राधिकरणाकरणाचे कर्मचारी दादागिरीची भाषा वापरून ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. चौपट भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत मोजणी होऊ देणार नाही.
– डॉ. अभिजित इंगवले, हातकणंगले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी करतात असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मत चोरी म्हणजे सामान्य मतदाराचा अपमान...
Ratnagiri News – कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी पंचक्रोशीत भात शेतीचे प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर
Photo – पवईमध्ये थरारक ओलीसनाट्य आणि एन्काउंटर
Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप
IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला, टीम इंडियाला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 339 धावांचं आव्हान