राज्यात स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांचे आवाहन... कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये!

राज्यात स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले.

मुंबई : राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आणि त्यांच्याकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त केले आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पूर्वीच्या काळात अशा स्पर्धा परीक्षांत काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. आणि म्हणूनच राज्य शासनाने टीसीएस आणिआयबीपीएस या कंपन्यांकडून या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संस्था काटेकोरपणे या परीक्षा घेतील. राज्य शासनाचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच महाराष्ट्रात पुन्हा आणखी एका निवडणुकीची घोषणा मोठी बातमी! लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच महाराष्ट्रात पुन्हा आणखी एका निवडणुकीची घोषणा
लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचं...
पॅलेस्टाईन-इस्त्रायल वादावर सोशल मीडियावर पोस्ट, मुख्याध्यापिकेस गमवावी लागली नोकरी
शॉरमा खाताना सावधान, मुंबईत १९ वर्षीय मुलाचा मृत्यू, विक्रेत्याविरुद्ध कारवाई
नजर लागू नये म्हणून आलिया भट्टने केला हा उपाय, रेड कार्पेटवर देसी लूक
ऐश्वर्या राय – कतरिना कैफ कोण आहे सर्वात बेस्ट, सलमान खान याने दिलेलं उत्तर चर्चेत
‘द महाराष्ट्र फाइल्स’मध्ये हिंदी गाण्यावर थिरकरणार गौतमी पाटील
अमिताभ बच्चन- दीपिका यांची पोलखोल, अखेर ‘त्या’ फोटोतून सत्य उघड…