सांगलीतून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची 13 तासांत सुटका

सांगलीतून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची 13 तासांत सुटका

सांगलीनजीक हरिपूर रस्त्यावरील पाटणे प्लॉट परिसरातून एका व्यावसायिकाचे तीन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अवघ्या 13 तासांत कौशल्याने तपास करून दोन खंडणीखोरांच्या मुसक्या आवळत व्यावसायिकाची सुटका केली. शनिवारी पहाटे 2.30 च्या सुमारास विश्रामबाग परिसरात थरारक पाठलाग करून पोलिसांनी खंडणीखोरांना अटक केली.

नीलेश बाळासाहेब गालिंदे (वय 30, रा. आनंद चित्रपटगृहासमोर, गावभाग) आणि मनोज मोहनसिंग दुबे (वय 32, रा. 6 वी गल्ली, वारणाली) अशी अटक करण्यात आलेल्या खंडणीखोरांची
नावे आहेत.

पोलिसांनी खंडणीखोरांकडून गुह्यात वापरलेली सात लाखांची चारचाकी जप्त करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सचिन शिंदे, संदिप पाटील, मच्छिंद्र बर्डे, रफिक मुलाणी, विनायक शिंदे, गणेश कांबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदिप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, कॅप्टन गुंडवाडे यांनी सहभाग घेतला.

फिर्यादी सूरज बाळासाहेब पाटील (वय 30, रा. हरिपूर रस्ता, पाटणे प्लॉट, सांगली) यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची आणि संशयित दोघांची दुकानामुळे ओळख होती. संशयितांनी फिर्यादी सूरज पाटील यांचे शनिवारी (दि. 30) दुपारी अपहरण केले होते. मिरज तालुक्यातील भोसे येथील तलावाकडे नेऊन संशयितांनी फिर्यादी सूरज यास जबर मारहाण केली. तसेच संशयितांनी सूरज यांना, ‘तुला जिवंत सोडणार नाही, तुझे तुकडे करतो’, अशी धमकी दिली. यानंतर संशयित मनोज दुबे याने मोबाईलवरून आंबी यांना चित्रण दाखवले आणि तीन लाख रुपये दिले तर तो जिवंत घरी येईल, अशी धमकी दिली.

याबाबत घाबरलेल्या विनायक आंबी यांनी तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे प्रकटीकरण शाखेस याचा तपास करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, तांत्रिक तपासाच्या आधारे सुरू असलेल्या पोलीस तपासात संशयित सतत जागा बदलत असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी दुपारपासून संशयित व्यावसायिकास घेऊन भोसे, अंकली, हातकणंगले, दानोळी, मिरज येथे अशा ठिकाणी नेले होते. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास संशयित व्यावसायिक सूरज यास घेऊन विश्रामबागकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वालचंद महाविद्यालयासमोर सापळा लावला होता. काही वेळातच भरधाव वेगाने येणाऱया चारचाकीमध्ये सूरज असल्याचे कळताच, पोलिसांनी चारचाकीचा पाठलाग केला. संशयितांनी वेगात चारचाकी चालवून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना खंडणीखोरांना जेरबंद करण्यात यश मिळाले. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;