हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवडे झाले. आतापर्यंत 135 लाख मॅट्रिक टन ऊस गाळप झाले असून शंभर लाख क्विंटल नवी साखर तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये गाळभंगाच्या पहिल्या टप्प्यात अनुकूल हवामान आणि कारखान्यांची गाळप क्षमता याचा मेळ बसल्याने हंगामाने पहिल्या तीन आठवडय़ांतच जोर धरला आहे.

 सद्यस्थितीमध्ये दीडशेपेक्षा अधिक साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केलेला आहे. प्रत्यक्षात एक नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाला असला तरी कारखाने काही दिवस मागेपुढे सुरू झाले. सुरुवातीचे काही दिवस पावसाचे असल्यामुळे आठवडा तसा वाया गेला. नंतर मात्र हंगामाने जोर पकडला. 80 सहकारी आणि 70 खासगी कारखान्यांनी मिळून दहा टक्के म्हणजे 135 लाख टन उसाचे गाळप केले आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्या टप्प्यातच साखर उतारा अपेक्षेपेक्षा चांगला मिळत असल्याने कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षीची तुलना करता उसाचा तुटवडा असल्यामुळे हंगाम 15 नोव्हेंबरला सुरू झाला. 20 नोव्हेंबरपर्यंत अवघे 17 लाख टन गाळप होते आणि साखर उत्ताराही पावणेपाच टक्केच होता. चालू हंगामात साखर उतारा सुरवातीलाच 7.47 टक्के मिळाल्याने कारखान्यांबरोबर शेतकऱयांनाही त्याचा फायदा होणार आहे.

हमीपत्रावर परवाने

साखर आयुक्तालयाने 193 साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. एफआरपी शिल्लक असलेल्या कारखान्यांचे गाळप हंगामासाठी परवाने अडवता येणार नसल्याच्या सूचना राज्य सरकारच्या आहेत. त्यामुळे अशा कारखान्यांकडून हमीपत्रे घेतली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवडे झाले. आतापर्यंत 135 लाख मॅट्रिक टन ऊस गाळप झाले असून...
चुटकीवाला भोंदूबाबा ठाण्यात जेरबंद; कोल्हापूर पोलिसांची कारवाई, पाच दिवसांची पोलीस कोठडी
मुंबईत 11 लाख दुबार मतदार कोणासाठी घुसवले! काँग्रेसचा सवाल
मध्य रेल्वेच्या भायखळा मेकॅनिकल इन्स्टिटय़ूटवर भगवा फडकला, रेल कामगार सेनेचा दणदणीत विजय
राज ठाकरे यांचा धोक्याचा इशारा, मुंबई हातातून गेली तर सत्ताधारी थैमान घालतील
चीनमध्ये लोळण्याची अनोखी स्पर्धा
पराभवाच्या भीतीनेच भाजपकडून फुटीचे राजकारण, हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी लावालावी सुरू आहे; आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला