मुंबईची हवा बिघडली, चिंता आणखी वाढली; गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत

मुंबईची हवा बिघडली, चिंता आणखी वाढली; गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत

दिल्लीपाठोपाठ मुंबईची हवासुद्धा विषारी बनली आहे. रविवारी सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 210 अंकांच्या पातळीवर गेला. हा निर्देशांक गंभीर श्रेणीत गेल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे असून प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

गेल्या आठवडय़ात मुंबई शहर आणि उपनगरात थंडीची तीव्रता वाढली. सलग चार दिवस तापमान 16 ते 17 अंशाच्या आसपास राहिले. त्यातच वातावरणातील प्रदूषित घटकांमुळे हवा बिघडली आहे. रविवारी सकाळी उपनगरातील तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअसच्या आसपास असूनही प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांना जड आणि अस्वस्थ वाटत होते. पहाटेपासूनच सर्वत्र धुके पसरल्याने आकाश निस्तेज व अस्पष्ट दिसत होते. सूक्ष्म कणांचे उच्च प्रमाण हवेत असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून प्रामुख्याने मालाड, बोरिवली, देवनार, वरळी आणि माझगावची हवा वाईट श्रेणीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी हा निर्देशांक 160 इतका नोंदवला गेला होता. आता मात्र त्यात झपाटय़ाने वाढ झाली असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक 210 अंकांच्या पातळीवर गेला आहे.

मुंबईतील बांधकाम, वाहनांमधून निघणारा धूर, रात्रीच्या वेळी करण्यात येणाऱ्या शेकोटय़ा तसेच मुंबईतील कारखान्यांमधून निघणारा धूर वायुप्रदूषणाला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईच्या तापमानात हळूहळू वाढ होत असतानादेखील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होताना दिसत नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देश-विदेश – चिलिकाचे सरोवर पक्ष्यांनी गजबजले देश-विदेश – चिलिकाचे सरोवर पक्ष्यांनी गजबजले
हिवाळ्याची चाहूल लागताच चिलिका शहर पक्ष्याच्या किलबिलाटाने गजबजले आहे. आशियातील हा सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे. या विस्तीर्ण सरोवरात...
20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली! उद्या ‘सुप्रीम’ सुनावणी… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची चिन्हे
निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचा गौप्यस्फोट करणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा
न्या. सूर्य कांत आज घेणार शपथ, पाच कोटी प्रलंबित खटल्यांचे नव्या सरन्यायाधीशांपुढे आव्हान
भाजपनं आमचं कंबरडं मोडलं, गुलाम बनवताहेत आम्हाला! शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांचा जाहीर आरोप
मते कमी पडली तर परिणाम भोगावे लागतील, मुश्रीफ यांनी भरला दम
विज्ञानरंजन – स्थैर्य जल