राज ठाकरे यांचा धोक्याचा इशारा, मुंबई हातातून गेली तर सत्ताधारी थैमान घालतील
रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, मुंबई हातातून गेली तर सत्ताधारी थैमान घालतील, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱअयांवर हल्ला चढवतानाच मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन केले. ज्या पध्दतीचे राजकारण सध्या सुरू आहे, त्या परिस्थितीत आपण गाफील राहिलो तर मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल, मुंबई हातातून गेलीच असे समजा, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला.
शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 203 मधील कामगार मैदानात आयोजित 11 व्या कोकण महोत्सवाला राज ठाकरे यांनी भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मतदार याद्या नीट तपासून पहा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List