दिल्लीनंतर आता राजस्थानातही प्रदूषणाची समस्या गंभीर; श्वसनाच्या त्रासामुळे 24 जण रुग्णालयात दाखल

दिल्लीनंतर आता राजस्थानातही प्रदूषणाची समस्या गंभीर; श्वसनाच्या त्रासामुळे 24 जण रुग्णालयात दाखल

राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. तेथील हवेची श्रेणी धोकादायक स्थितीत असल्याने तेथील ग्रेपच्या नियमात बदल करण्यात आले आहे. आता दिल्लीनंतर राजस्थानातही प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. राजस्थानातील सिकरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे २४ जणांना श्वसनाच्या त्रासाने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राजस्थानमधील सिकरमधील प्रदूषित हवेमुळे अनेक लोक आजारी पडले आहेत. औद्योगिक क्षेत्र आणि बस डेपोजवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह दोन डझनहून अधिक लोकांना श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने एसके रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

रविवारी राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील प्रदूषणाची स्थिती अचानक बिकट झाली आणि शहरातील औद्योगिक क्षेत्र आणि बस डेपोभोवती विषारी हवेमुळे सुमारे दोन डझन लोक आजारी पडले. आजारी पडलेले रुग्ण शहराच्या औद्योगिक क्षेत्र आणि बस डेपोजवळ राहतात. गेल्या काही दिवसांपासून या भागात प्रदूषित हवेमुळे सतत दुर्गंधी आणि धुके पसरत आहे.

स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, सकाळी अचानक हवेतील प्रदूषण वाढले. त्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. जवळच्या LBS शाळेतील मुलांनीही श्वास घेण्यास त्रास आणि डोळ्यांना जळजळ होत असल्याची तक्रार केली. स्थानिक रहिवासी म्हणतात की प्रदूषणामुळे त्यांचे दैनंदिन जीवन कठीण होत आहे, परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

रुग्णालय प्रशासनाच्या मते, दाखल केलेले सर्व रुग्ण सध्या स्थिर आहेत आणि निरीक्षणाखाली आहेत. डॉक्टरांच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये वायू प्रदूषणामुळे अॅलर्जी आणि श्वसनाच्या समस्या असल्याचा संशय आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निश्चितपणे निवडणुकीत घोटाळे झाले, पण…; प्रशांत किशोर यांनी केले स्पष्ट निश्चितपणे निवडणुकीत घोटाळे झाले, पण…; प्रशांत किशोर यांनी केले स्पष्ट
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयू आघाडीला राक्षसी बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत निश्चितपणे घोटाळे झाले आहेत, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे....
IND Vs SA ODI Series – केएल राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा, मराठमोळ्या खेळाडूची संघात एन्ट्री
मालगुंडमध्ये रंगली विटीदांडूची स्पर्धा; पारंपारिक खेळाला शिवसैनिकांनी दिली संजीवनी
Photo – प्रदूषित हवेने मुंबईकरांची चिंता वाढवली
जिंकण्याची शक्यता नसल्याने हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी करण्याचे भाजपचे राजकारण सुरू; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
Nanded News – हदगावच्या नायब तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; गुन्हा दाखल
फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई तीव्र, 9.63 लाख प्रवाशांकडून 40.59 कोटी रुपये वसूल