दोन लाखांसाठी डिस्चार्ज रोखला, नानावटीतून रुग्णाने शेअर केला व्हिडीओ

दोन लाखांसाठी डिस्चार्ज रोखला, नानावटीतून रुग्णाने शेअर केला व्हिडीओ

विलेपार्ले पश्चिम येथील नानावटी रुग्णालयात दोन लाख रुपयांसाठी एका रुग्णाचा डिस्चार्ज रोखल्याचे समोर आले आहे. समरजीत सुखदेव सिंग असे या रुग्णाचे नाव आहे. समरजीत यांनी स्वतः व्हिडिओ शेअर करून त्यांची व्यथा मांडली आहे. दोन लाखांसाठी डिस्चार्ज रोखल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या 27 दिवसांपासून समरजीत नानावटी रुग्णालयात आहेत. ताप डोक्यात गेल्यामुळे ते येथे भरती झाले होते. साधारण 14 दिवसांचे उपचार असून तुम्ही ठणठणीत बरे व्हाल, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. या उपचारांसाठी मित्रमंडळी व नातलगांकडून उसनवारी करून त्यांनी बराच खर्च केला. खर्च वाढतच गेल्याने त्यांनी बिलिंग डिपार्टमेंटकडे चौकशी केली व बिल मागवले. या बिलात नमूद उपचार आणि प्रत्यक्षात देण्यात आलेले उपचार यात मोठी तफावत होती, असा दावा समरजीत यांनी केला आहे.

उपचार पूर्ण झाल्यानंतरही डिस्चार्ज दिला जात नसल्याचा आरोप समरजीत सिंग यांनी केला. बिलात दुरुस्ती करण्याची विनंती आम्ही केली. मात्र, ती फेटाळण्यात आली.

डिस्चार्ज हवा असेल तर एक लाख रुपये भरा, असे तेथील अकाऊंटटने मला सांगितले. शेवटी नाईलाजाने आम्ही 1 लाख रुपयांची व्यवस्था केली. त्यातले 50 हजार रुपये भरले. राहिलेले डिस्चार्ज पेपर मिळाल्यानंतर देऊ असे सांगितले. मात्र आता ते 2 लाख रुपयांची मागणी करत आहेत,’ असा आरोप समरजीत यांनी केला आहे.

इथेच जीव द्यावा लागेल!

‘नानावटीतील मानसिक छळामुळे आम्ही कंटाळलो आहोत. आमच्याकडे आता काहीच उरलेले नाही. दोन मुलांना दुसऱयांकडे सोडून आम्ही 27 दिवसांपासून येथे आहोत. मी आणि माझी पत्नी दोघेही मानसिक तणावात आहोत. आता सहन होत नाही. इथेच आत्महत्या करण्याशिवाय मला पर्याय नाही,’ असा इशारा समरजीत यांनी दिला आहे.

आरोप काय…

1700 रुपयांच्या इंजेक्शनचे शुल्क 17 हजार रुपये लावले

डॉक्टर तपासणीसाठी दहा वेळा आले, बिलात 17 व्हिजिट दाखवल्या.

एकदाच केलेली टेस्ट दोनदा केल्याचे दाखवले.

या बातमीसाठी इंग्रजी SEO लिहून द्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हंगाम जोरात; 135 लाख टन ऊस गाळप; तीन आठवड्यात 100 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवडे झाले. आतापर्यंत 135 लाख मॅट्रिक टन ऊस गाळप झाले असून...
चुटकीवाला भोंदूबाबा ठाण्यात जेरबंद; कोल्हापूर पोलिसांची कारवाई, पाच दिवसांची पोलीस कोठडी
मुंबईत 11 लाख दुबार मतदार कोणासाठी घुसवले! काँग्रेसचा सवाल
मध्य रेल्वेच्या भायखळा मेकॅनिकल इन्स्टिटय़ूटवर भगवा फडकला, रेल कामगार सेनेचा दणदणीत विजय
राज ठाकरे यांचा धोक्याचा इशारा, मुंबई हातातून गेली तर सत्ताधारी थैमान घालतील
चीनमध्ये लोळण्याची अनोखी स्पर्धा
पराभवाच्या भीतीनेच भाजपकडून फुटीचे राजकारण, हिंदू-मुस्लिम, मराठी-अमराठी लावालावी सुरू आहे; आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला