भाजपनं आमचं कंबरडं मोडलं, गुलाम बनवताहेत आम्हाला! शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांचा जाहीर आरोप

भाजपनं आमचं कंबरडं मोडलं, गुलाम बनवताहेत आम्हाला! शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांचा जाहीर आरोप

भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटातील खदखद ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर येऊ लागली आहे. दोघांमधून विस्तव जात नसल्याचे गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून स्पष्ट झाले असतानाच शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांनी आज भाजपवर गंभीर आरोप केला. भारतीय जनता पक्षाने आमचं कंबरडं मोडलं, आम्हाला गुलाम बनवलं जातंय, असे शहाजीबापू पाटील म्हणाले. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांचा सोलापूरच्या सांगोला मतदारसंघात शेकापच्या बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला होता. त्याला भाजपची फूस होती, असा शिंदे गटाचा दावा आहे. आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून भाजपवर थेट आरोप केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रामाणिकपणे मदत करूनही भाजपने विधानसभेत आपला विश्वासघात केला. पण भाजपने कितीही फसवले तरी आमची लढणारी अवलाद आहे, पैशाच्या जिवावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका, असा इशारा पाटील यांनी भाजपला दिला आहे.

बापूला कुणी फसवू शकणार नाही

एकनाथ शिंदे यांनीही शहाजीबापूंची री ओढत भाजपवर टीका केली. बापूला किती वेळा फसवणार, एकदा-दोनदा फसवाल, पण आता बापूला कुणी फसवू शकणार नाही, असे म्हणत शिंदे यांनी भाजपबद्दलची आपली नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली.

काही माध्यमे वेडी झालीततसं काही घडलंच नाही फडणवीस

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांमधून होत आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘हा वेडय़ांचा बाजार सुरू आहे आणि काही माध्यमे वेडी झाली आहेत. हुतात्मा स्मारकारवर मी आणि शिंदे गेलो होतो तेव्हा येताना आणि जाताना आम्ही भेटलो. ते कुठे जात आहेत त्यांनी सांगितले आणि मी कुठे जात आहे हे मीसुध्दा सांगितले. कालच्या कार्यक्रमातही आमच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याचे ठरले होते. पण स्टेजवर आणि येताजाताना आम्ही भेटलो. त्यामुळे आम्ही न बोलण्यासारखे काही घडलेच नाही. जे लोक तसे दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत.’

आता नगरपालिकेच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून येऊन भाजपवाल्यांनी गुंडशाही सुरू केली आहे. महाराष्ट्र मला घाबरतो आणि भाजपची कुत्रीमांजरं मला घाबरवायला निघाली आहेत. – शहाजीबापू पाटील

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देश-विदेश – चिलिकाचे सरोवर पक्ष्यांनी गजबजले देश-विदेश – चिलिकाचे सरोवर पक्ष्यांनी गजबजले
हिवाळ्याची चाहूल लागताच चिलिका शहर पक्ष्याच्या किलबिलाटाने गजबजले आहे. आशियातील हा सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे. या विस्तीर्ण सरोवरात...
20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली! उद्या ‘सुप्रीम’ सुनावणी… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची चिन्हे
निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचा गौप्यस्फोट करणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा
न्या. सूर्य कांत आज घेणार शपथ, पाच कोटी प्रलंबित खटल्यांचे नव्या सरन्यायाधीशांपुढे आव्हान
भाजपनं आमचं कंबरडं मोडलं, गुलाम बनवताहेत आम्हाला! शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांचा जाहीर आरोप
मते कमी पडली तर परिणाम भोगावे लागतील, मुश्रीफ यांनी भरला दम
विज्ञानरंजन – स्थैर्य जल