पश्चिम, मध्य रेल्वेने पालिकेची 500 कोटींची पाणीपट्टी थकवली! थकबाकी वसूल करण्यात पालिका प्रशासन असमर्थ

पश्चिम, मध्य रेल्वेने पालिकेची 500 कोटींची पाणीपट्टी थकवली! थकबाकी वसूल करण्यात पालिका प्रशासन असमर्थ

पश्चिम आणि मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षांत तब्बल 500 कोटी रुपयांचे पाणी बिल थकवले आहे. पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेचे तब्बल 328.07 कोटी रुपयांचे पाणी बिल भरलेले नाही, तर मध्य रेल्वे पाणी बिलाचे एकूण 172.10 कोटी रुपये मुंबई महापालिकेला देणे बाकी आहे. नागरिकांवर तत्काळ कारवाई करणारे पालिका प्रशासन पश्चिम व मध्य रेल्वेकडील थकबाकी वसूल करण्यात असमर्थ ठरले आहे.

मुंबई महापालिकेने पश्चिम रेल्वेला 201 पाणी कनेक्शन दिले आहेत. परंतु पश्चिम रेल्वेने गेल्या काही वर्षांपासून त्याचे बिल भरलेले नाही. ते बिल सप्टेंबरमध्ये 328.07 कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. याचदरम्यान पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेकडूनच करापोटी 338 कोटी रुपये येणे असल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या अनेक पाईपलाईन पश्चिम रेल्वेच्या जमिनीतून जातात. जमीन रेल्वेच्या मालकीची असल्याने मुंबई महापालिकेने ‘राईट ऑफ वे’ किंवा ’लेव्ही चार्जेस’ म्हणून ओळखला जाणारा कर भरणे आवश्यक आहे. ही रक्कम 338 कोटी रुपये आहे. अशा प्रकारे पालिकेकडूनही  रक्कम येणे बाकी असल्याने दोन्ही यंत्रणांनी बैठकीतून तोडगा काढला पाहिजे, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे, मध्य रेल्वेने सप्टेंबरपर्यंत पालिकेचे 172.10 कोटी देणे बाकी आहे. पालिकेने मध्य रेल्वेला 182 कनेक्शन दिली आहेत. त्यावर पाणी बिलाची थकीत रक्कम केवळ 44.44 कोटी रुपये असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. पालिकेने मध्य रेल्वेला ‘राईट ऑफ वे’ शुल्काअंतर्गत एकूण 137.47 कोटी देणे बाकी असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त पादचारी पूल किंवा रोड ओव्हरब्रिजला जागा देण्यासाठी रेल्वे पालिकेकडून शुल्क आकारते. त्याचे 260.59 कोटी रुपये पालिकेकडून येणे बाकी असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

पालिकेकडून फक्त नोटिसा

रेल्वे ही एक सरकारी यंत्रणा आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे वीज किंवा पाणी कनेक्शन तोडू शकत नाही. पालिका फक्त नोटिसा जारी करू शकते. थकीत रकमेचा गुंता दोन्ही यंत्रणांतील बैठकीतून सामोपचारानेच सुटला जाईल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पश्चिम रेल्वेनेही थकीत पाणी बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेला दोनदा पत्रे लिहिली. त्यावर पालिकेकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या
आरोग्यतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ लोकांना निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त करतात. जर आपण आपल्या आहारात जंक फूड, प्रक्रिया केलेले...
800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर
उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार
टिटवाळ्यातील रायते नदीत दोन तरुण बुडाले
भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र