शेतजमीन नियमित करण्यास दिरंगाई, हायकोर्टाकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी

शेतजमीन नियमित करण्यास दिरंगाई, हायकोर्टाकडून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी

शेतजमीन नियमित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे 2009 साली अर्ज करूनही भूखंड नियमित न केल्याने मुंबई उच्चन्यायालयाने ठाणे जिल्हाधिकाऱयांची चांगलीच कानउघाडणी केली. जिल्हाधिकाऱयांच्या निक्रियतेमुळे हे प्रकरण अवाजवी काळासाठी प्रलंबित राहिले असून यामुळे शेतकऱयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतजमिनीचे सहा महिन्यांत नियमितीकरण करा, असे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

कल्याणमधील भगवान भोईर अनेक दशकांपासून सरकारी जमिनीवर शेती करत होते, त्यांनी त्यांच्या जमिनीच्या नियमितीकरणासाठी अर्ज केला. राज्य सरकारने 27 डिसेंबर 1978 आणि 28 नोव्हेंबर 1991 रोजी आदिवासी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या अतिक्रमित सरकारी जमिनी नियमित करण्यास परवानगी देणारा जीआर जारी केला. यासंदर्भात 2007 आणि 2008मध्येही जीआर जारी करण्यात आले. त्यानुसार भोईर यांनी 2009 साली ठाणे जिल्हाधिकाऱयांकडे अर्ज केला. ऑगस्ट 2011मध्ये जिल्हाधिकाऱयांनी भोईर यांच्या अर्जाचा योग्य विचार न करता तो फेटाळला. अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी जमीन नियमितीकरणासाठीचे त्यांचे अपील फेटाळले. त्यामुळे भोईर यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली. या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी खंडपीठाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले. जर निर्णयाची अंमलबजावणी तातडीने आणि कायद्यानुसार घेतली गेली नाही तर याचिकाकर्त्याच्या अधिकारांवर परिणाम होईल. त्यामुळे भूखंडाचे सहा महिन्यांत नियमितीकरण करा असे बजावत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या
आरोग्यतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ लोकांना निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त करतात. जर आपण आपल्या आहारात जंक फूड, प्रक्रिया केलेले...
800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर
उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार
टिटवाळ्यातील रायते नदीत दोन तरुण बुडाले
भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र