नार्वेकरांच्या बंगल्याच्या डागडुजीवर तब्बल 1 कोटी 4 लाखांची उधळपट्टी

नार्वेकरांच्या बंगल्याच्या डागडुजीवर तब्बल 1 कोटी 4 लाखांची उधळपट्टी

अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला देण्यासाठी महायुती सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. दुसरीकडे आठ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱया मंत्र्यांच्या बंगल्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जाणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या रवी भवन येथील बंगल्यावर तब्बल 1 कोटी 4 लाखांची उधळपट्टी केली जाणार आहे.

राज्य आर्थिक संकटात असल्याने एका विभागाचा निधी दुसऱ्या विभागाच्या योजनेसाठी वळविला जात आहे. पूरग्रस्त शेतकऱयांना सरकारने घोषीत केलेली मदत देण्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. या अशा परिस्थितही रवी भवन येथील विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या नऊ नंबरच्या बंगल्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. यासाठी 30 टक्के कमी दराने निविदा भरण्यात आली असून कामही सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने एका बंगल्यावर तब्बल एक कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्यामुळे उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. अधिवेशनाच्या तयारीच्या निमित्ताने मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी कोटय़वधींचा खर्च का, असा सवाल सर्वसामान्यांकडून केला जात आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 100 कोटींच्या खर्चाचे प्रस्ताव

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 100 कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत. विधान भवन, रवी भवन, नागभवन, देवगिरी, रामगिरी, राजभवन तसेच 150हून अधिक गाळ्यांची देखभाल-दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रसिद्ध करून काही कामेही सुरू झाली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या
आरोग्यतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ लोकांना निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त करतात. जर आपण आपल्या आहारात जंक फूड, प्रक्रिया केलेले...
800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर
उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार
टिटवाळ्यातील रायते नदीत दोन तरुण बुडाले
भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र