शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाही मंत्रिमंडळ बैठकीत तुफान राडा, मंत्री आणि अधिकाऱ्यांची खडाजंगी

शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाही मंत्रिमंडळ बैठकीत तुफान राडा, मंत्री आणि अधिकाऱ्यांची खडाजंगी

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना महायुती सरकारने मोठा गाजावाजा करून 7 ऑक्टोबर रोजी 31 हजार 600 कोटींचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वी मदत शेतकऱयांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र दिवाळी संपली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. पैसा हातात नसल्याने शेतकऱयांची दिवाळीही यंदा अंधारात गेली. याचे तीव्र पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. मंत्री आणि अधिकाऱयांची खडाजंगी झाली.

शेतकऱ्यांना अद्याप मदत का पोहोचली नाही याबद्दल अधिकाऱयांना जाब विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आतापर्यंत किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली याचा अहवाल तातडीने सादर करा, असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांना दिले. अतिवृष्टीमुळे मराठवाडा, सोलापूर व अन्य भागांतील शेतकऱ्यांची पिके आणि संसार वाहून गेले, शेतातली जमीन खरडून गेली, विहिरी गाळाने भरल्या. विरोधी पक्षांनी शेतकऱयांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी जोरदार पाठपुरावा केल्यानंतर महायुती सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले, परंतु घोषणेनंतर आज वीस दिवस उलटल्यानंतरही बहुतांश शेतकऱयांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. कुठे पंचनामे अडलेत तर कुठे निकषांवरून अधिकारी अडवणूक करत असल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याच मुद्दय़ावरून मंत्र्यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. शेतकऱयांच्या खात्यात अद्याप पैसे पोहोचलेले नाहीत अशा सर्वपक्षीय आमदारांच्या तक्रारी आहेत. त्याबद्दल अधिकाऱयांना जाब विचारण्यात आला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. बहुतांश शेतकऱयांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱयांकडून करण्यात आला. अधिकाऱयांचा तो कावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात येताच आजपर्यंत किती शेतकऱयांच्या खात्यात किती पैसे जमा झाले त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईची रक्कम खात्यात आली तर त्यातून तरी दिवाळीत दिवे लावता येतील अशा आशेवर शेतकरी होते. पण ही जबाबदारी ज्या अधिकाऱयांवर होती ते दिवाळीत सलग पाच दिवस सुट्टीवर होते. परिणामी दिवाळीतही शेतकऱयांना पैसे मिळाले नाहीत आणि त्यांची दिवाळी अंधारात गेली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या
आरोग्यतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ लोकांना निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त करतात. जर आपण आपल्या आहारात जंक फूड, प्रक्रिया केलेले...
800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर
उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार
टिटवाळ्यातील रायते नदीत दोन तरुण बुडाले
भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र