आठव्या वेतन आयोगाला मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी

आठव्या वेतन आयोगाला मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी

आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तब्बल 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. हा निर्णय त्यांच्यासाठी दिवाळीसारखाच ठरला आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांची आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा आयोग महागाईला अनुसरून विद्यमान व निवृत्त कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा सुचवणार आहे. पुढील 18 महिन्यांत आयोग केंद्राला शिफारस करेल. आयोगाची शिफारस 1 जानेवारी 2026पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याचा सरकारचा विचार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.

घोषणेनंतर 10 महिन्यांनी निर्णय

जानेवारी 2025मध्ये मोदी सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तब्बल 10 महिन्यांनी त्यास प्रत्यक्ष मंजुरी देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या
आरोग्यतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ लोकांना निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त करतात. जर आपण आपल्या आहारात जंक फूड, प्रक्रिया केलेले...
800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर
उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार
टिटवाळ्यातील रायते नदीत दोन तरुण बुडाले
भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र