न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरवण्याचा डाव; संजय राऊत यांचा घणाघात

न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरवण्याचा डाव; संजय राऊत यांचा घणाघात

शेतकरी कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आता याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन करणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरवण्यात येत आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचे नागपुरात आंदोलन सुरू आहे. चक्का जाम करण्यात आला असून त्यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. या सर्व घडामोडी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये सुरू आहेत, आता फडणवीस तोंडाला पट्टी बांधून का बसले आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांना अर्बन नक्षलवादी म्हणजे शहरी नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत, निवडणुकीबाबत, मतदार यादीतील घोळाबाबत, राज्याच्या समस्यांबाबत, बेरोजगारी, वाढती महागाई यावर कोणी बोलले तर त्यांनी शहरी नक्षलवादी, मओवादी घोषित करण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आंदोलन करत आहेत. मात्र, काही काळ वगळता बच्चू कडू हे त्यांच्यासोबतच होते. बच्चू कडू, फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या गळ्यातगळे घालून फिरत होते. मात्र, आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवल्याने त्यांना शहरी नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. सातबारा कोरा करा, ही त्यांची महत्त्वाची मागणी आहे. सातबारा कोरा करा, किंवा चालते व्हा, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. ही मागणी त्यांनी सर्वात आधी केली होती. आता ती मागणी पुन्हा एकदा जोर धरत असेल तर आंदोलकांना शहरी नक्षलवादी ठरवणे कितपत योग्य आहे? आंदोलन केले की शहरी नक्षलवादी ठरवण्यात येते, तर मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांना अर्बन नक्षलवादी का ठरवण्यात येत नाही? मंत्रिमंडळात अनेक भ्रष्टाचारी अॅनाकोंडा बसले आहेत. त्यांना नक्षलवादी का ठरवत नाही? असा सवालही त्यांनी केला. बच्चू कडू यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. ते अराजकीय आंदोलन आहे. हे दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांनी आवाज उठवायचा नाही काय? असा सवालही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या
आरोग्यतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ लोकांना निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त करतात. जर आपण आपल्या आहारात जंक फूड, प्रक्रिया केलेले...
800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर
उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार
टिटवाळ्यातील रायते नदीत दोन तरुण बुडाले
भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र