भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र

भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला त्यांच्या भाषेवरून फटकारले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या स्तारवरील आरोप करणे हा लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात त्यांनी केला. तसेच त्यांनी मिंध्यांनाही जबरदस्त टोला लगावला.

राज्यात कमालीची अस्थिरता आणि अशांतता आहे. बच्चू कडू रस्त्यावर उतरले आहेत. मनोज जरांगे यांनी आंदोलन केले. अनेक जातीचे लोकं रस्त्यावर उतरत आहेत. सरकारविरोधात रोष वाढत आहे. आंदोलन केल्यावर महाराष्ट्रात अॅनाकोंडा येणार आणि सांगणार की, दुर्बिणीतून बघायलाही विरोधक शिल्लक ठेऊ नका, ही त्यांची भाषा आहे. अशा प्रकारची भाषा ईदी अमीनने केली होती. त्यानंतर अशी भाषा भाजपवाले करत आहेत.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावेळी विखेपाटील यांना पाठवले, आता चंद्रशेखर बावनकुळे यांना चर्चेसाठी पाठवत आहेत. मुख्यमंत्री कधी शेतकऱ्यांना सामोरे जाणार, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी यांना पप्पू ठरवण्यासाठी भाजपने 30 हजार कोटी रुपये खर्च केले. पण राहुल गांधी ठामपणे स्वबळावर उभे आहेत. त्यांनी 100 जागा जिंकून आणल्या आहेत. तसेच ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते असून ते सत्ताधाऱ्यांच्या ढुंगणाखाली बुडबुडे काढत आहेत. राहुल गांधी हे लोकनेते आहेत. ते पप्पू नसून लोकनायक आहे. मोदी हे लोकनेते नाहीत. भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले मोदी आणि अमित शहा हे बुडबुडे आहेत. ते राहुल गांधी यांना घाबरत आहेत. तसेच आता ते आदित्य ठाकरे यांनाही घाबरत आहेत. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचे जे प्रेझेन्टेशन केले, त्यामुळे त्यांची भीती आणखी वाढली आहे. त्यांनी जे मुद्दे मांडले, जे प्रश्न उपस्थित केले, त्यावर हे निरुत्तर झाले आहेत. त्यांनी जी कट्यार काढली ती त्यांच्या काळजात घुसली आहे. देशातील लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याला पप्पू म्हणणे हा लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे.

आता अॅनाकोंडा येत आहे. भाजप हा सर्वात मोठा अॅनाकोंडा आहे. हा अॅनाकोंडा काहीही गिळतो. भुखंड, विधानसभा, 40 आमदार, खासदार, देशाचे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, मरीन लाईन्सवरील भूखंड असे सर्व भाजपचा अॅनाकोंडा गिळतो. आता या अॅनाकोंडाला मुंबई गिळायची आहे , त्यामुळे या अॅनाकोंडापासून आपण सावध राहायला हवे. मिंधे हे अॅनाकोंडाचे पिल्लू आहे. हे पिल्लू पैशांनी भरलेले कंटेनर, ट्रक, टेम्पो गिळतो. हे पिल्लू बापाच्या सुरात सूर मिसळणारच, असा टोलाही त्यांनी लगवाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो, जाणून घ्या
आरोग्यतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ लोकांना निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त करतात. जर आपण आपल्या आहारात जंक फूड, प्रक्रिया केलेले...
800 किलो वजन… आहारात खातो काजू, बदाम, ग्रॅनोला; ‘या’ रेड्याच्या किमतीत मुंबईजवळ येईल एक घर
उच्चांकापासून सोने 13 हजार तर चांदी 29 हजारांनी घसरले; आणखी स्वस्त होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
पुणे बाजार समितीत वाहन प्रवेश टेंडरमध्ये घोटाळा! अडीच वर्षात काम न करता ठेकेदाराला दिले 70 लाख
गुंड नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांचा, ब्रिटन उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार
टिटवाळ्यातील रायते नदीत दोन तरुण बुडाले
भाजपची भाषा ही ईदी अमीनची भाषा; संजय राऊत यांचे टिकास्त्र