डबल नव्हे, ट्रिपल इंजिन सरकार हवे, विरोधक दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दर्पोक्ती

डबल नव्हे, ट्रिपल इंजिन सरकार हवे, विरोधक दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दर्पोक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनो असे लढा की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. महाराष्ट्रात विरोधक दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत, अशी दर्पोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईत झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहा म्हणाले, महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असल्यामुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही. मला येथे ट्रिपल इंजिन सरकार हवे. त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढून विरोधकांचा सफाया करावा. ते दुर्बिणीनेही दिसणार नाहीत याची काळजी घ्या, अशी दर्पोक्ती शहा यांनी केली.

महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवी सुरुवात करत आहे. डिसेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिह्यांत भाजपचे कार्यालय हवे. देशसुद्धा 100 टक्के पक्ष कार्यालयाच्या दिशेने घौडदौड करत आहे, असे शहा म्हणाले.

भाजपला कुबडय़ांचा आधार नको

2014 मध्ये येथे आम्ही पहिल्यांदाच स्वबळावर लढलो आणि प्रथमच महाराष्ट्राला भाजपचा मुख्यमंत्री मिळाला. त्यानंतर सलग तीन वेळा फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार आले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप आता स्वतःच्या बळावर एक मजबूत पक्ष म्हणून उभा आहे. भाजप कुठल्या कुबडय़ांचा आधार न घेतादेखील चालते, असे सांगत महायुतीच्या घटक पक्षांनाही शहा यांनी सूचक इशारा दिला.

भाजप काचेच्या घरात राहत नाही – फडणवीस

भाजपच्या नव्या कार्यालयाच्या जागेवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजप काचेच्या घरात राहत नाही. त्यामुळे आमच्यावर दगड भिरकावण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगत आक्षेप फेटाळले. पालिकेचे नियम पाळूनच ही जागा घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कॅच पकडताना क्रिकेटर श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंतर्गत...
हिवाळ्यात ‘हा’ एक पदार्थ खा आणि अनेक आजारांपासून आराम मिळवा… डॉक्टरकडे जावं लागणार नाही!
बिहार निवडणुकीपूर्वी RJD ने घेतला मोठा निर्णय, 27 गद्दारांची पक्षातून हकालपट्टी
Photo – पुण्याच्या ‘बीबी रेसिंग’ने पहिली फेरी गाजवली
अमित शहांना म्हटले लोहपुरुष, वल्लभभाई पटेलांसोबत केली तुलना; काँग्रेसने भाजपला फटकारले
LOC वर पाकिस्तानकडून फायरिंग, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर
खासगी बसचा हाय टेन्शन वायरला स्पर्श, भीषण आगीत तिघांचा होरपळून मृत्यू तर 12 जण जखमी