गर्भपात झाल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचं, महिलांनी लक्षात ठेवा काही गोष्टी

गर्भपात झाल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचं, महिलांनी लक्षात ठेवा काही गोष्टी

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं… यामध्ये अनेक महिलांना गर्भपाताचा देखील सामना करावा लागतो… अशात महिलांनी प्रकृती स्थिर नसते. म्हणून महिलांनी गर्भपातानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. गर्भधारणेच्या 20 आठवड्यांच्या आत गर्भ गर्भाशयातच मरण पावला तर आपण त्याला गर्भपात म्हणून ओळखतो. ही परिस्थिती कोणत्याही महिलेसाठी खूप भयावह असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येक महिला सर्व खबरदारी घेतं. शिवाय, ती डॉक्टरांच्या सल्ल्याचं पूर्णपणे पालन करते.

गर्भपातानंतर महिलेला जीवनशैलीत आणि आहारात आवश्यक बदल करणं आवश्यक आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येक महिलेने काळजी घेणं आवश्यक आहे. पण, आपण असं काही प्रकरण पाहतो जिथे काही आजारामुळे किंवा शारीरिक समस्येमुळे काही महिलांना गर्भपाताला सामोरं जावं लागतं.
गर्भपात एखाद्या महिलेला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रास देऊ शकतो. तिला त्याचा सामना करणं खूप कठीण असू शकतं. पण, या काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुमची पुनर्प्राप्ती जलद होईल आणि तुम्ही तुमच्या पुढील गर्भधारणेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहात याची खात्री होईल.

स्त्रीरोगतज्ज्ञांकडून सविस्तर माहिती घ्या.

जर एखाद्या महिलेचा अचानक गर्भपात झाला तर सर्वात आधी रक्तस्त्राव सुरू होतो. हे गर्भपाताचे पहिले लक्षण आहे. यावेळी महिलांनी डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार घ्यावेत. काही महिलांना गर्भपात झाल्यानंतर दीर्घकाळ रक्तस्त्राव होतो. या काळात टॅम्पन्स वापरू नयेत. टॅम्पन्सऐवजी नियमित पॅड वापरण्याचा प्रयत्न करा.

गर्भपात झाल्यानंतर, तुम्ही काही काळ लैंगिक संबंधांपासून दूर राहा. यामुळे संसर्गाचा धोका तर वाढतोच पण तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. गर्भपात झाल्यानंतर महिला कमकुवत होतात. या काळा महिलांनी विश्रांती घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पुन्हा लैंगिक संबंध ठेवणे चांगले.

गर्भपात झाल्यानंतर, महिलांनी कोणत्याही प्रकारची जड कसरत करू नये. गर्भवती महिलेचा अपघाती गर्भपात झाला तरी, हे लक्षात ठेवा की हा प्रवास सोपा नाही. गर्भपात झाल्यानंतर महिलेचं शरीर सहजासहजी बरं होत नाही. त्यासाठी निरोगी आहाराचं पालन करणं महत्वाचं आहे. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

(टीप: येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रिल्ससाठी बाईकवर करत होता स्टंट, नंतर असे काही घडले आणि जीवावर बेतले रिल्ससाठी बाईकवर करत होता स्टंट, नंतर असे काही घडले आणि जीवावर बेतले
रिल्स बनविण्याचा ट्रेण्ड जीवघेणा ठरत आहे. काहीतरी हटके करण्यासाठी तरुणाई जीवघेणे स्टंट करत आहे. अशातच हिमाचल प्रदेशमधील एका 22 वर्षीय...
हिंदुस्थाननं रशियाकडून तेल आयात पूर्णपणे थांबवलीय! डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार
Satara doctor suicide case – ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने केलेला संस्थात्मक खून; राहुल गांधींचा घणाघात
Dapoli News – ‘मार्केट डे’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उमटली लघुउद्योगाची जाणीव’
अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर
महाराष्ट्राच्या जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही; संजय राऊत यांचे विधान, 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा निघणार
1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा, डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार