कागलच्या उरुसात मध्यरात्री थरार; आकाशपाळणा 80 फुटांवर अडकला, दोन तासांनंतर 16 जणांची सुखरूप सुटका

कागलच्या उरुसात मध्यरात्री थरार; आकाशपाळणा 80 फुटांवर अडकला, दोन तासांनंतर 16 जणांची सुखरूप सुटका

कागलमध्ये सध्या सुरू असलेल्या उरुसात उत्साहाचे वातावरण असतानाच, काल (दि. 24) मध्यरात्री आकाशपाळण्याचा थरार उडवणारा थरकाप पाहावयास मिळाला. आकाशपाळण्याचा रोमांचक क्षण अनुभवायला गेलेले तब्बल 16 जण 80 फुटांवर हवेतच अडकले. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्नटेबल लायडर क्रेनद्वारे अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली. मध्यरात्री उशिरापर्यंत तब्बल दोन तास हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.

गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसानिमित्त कागलमध्ये जत्रा भरली आहे. एकीकडे जत्रेत उत्साहाचे वातावरण असतानाच रात्री नऊच्या सुमारास आकाश पाळण्यात तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल 80 फूट उंच हवेतच तो अडकून राहिला. त्यामुळे लहान मुले आणि महिलांसह 16जण त्यामध्ये अडकले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पाळण्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी सुखरूप सुटकेसाठी खाली नातेवाईकांसह उरुस कमिटी, पोलीस दल आणि प्रशासनाची चांगलीच घालमेल झाली.

सुटकेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्नटेबल लायडर क्रेनला पाचारण करण्यात आले. या अवाढव्य क्रेनद्वारे आकाशपाळण्यात हवेत अडकलेल्या 16 जणांना काही अंतरावर असलेल्या इमारतीवर उतरवून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत हा थरार सुरू होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर
सध्या बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्ष प्रचारात रंगले आहेत.  अशातच मोकामा विधानसभा मतदारसंघातून अनंत सिंह ही जोरदार प्रचार...
महाराष्ट्राच्या जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही; संजय राऊत यांचे विधान, 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा निघणार
1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा, डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार
शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र, त्यांचा मालक दिल्लीत असल्यानं त्यांना वारंवार जावं लागतं; संजय राऊत यांचा हल्लाबोल
satara News – राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली; गृहखाते फेल
हे करून पहा… हॉटेलसारखी तडका डाळ घरी करा
साखर आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना वजनकाट्यांच्या तपासणीसाठी भरारी पथके