मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला, मदतीचा खडकूही आला नाही; ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला, मदतीचा खडकूही आला नाही; ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेली पिके मातीसह वाहून गेली. त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर. दिवाळीला मदत मिळणारच, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने त्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. पण सरकारकडून खडकूही न आल्याने सण कसा साजरा करायचा? बायकोला नवी साडी. जगायचे कसे ? अशा प्रश्नांनी हतबल झालेल्या पैठण तालुक्यातील खादगाव आणि तुपेवाडी येथील दोन शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत जगाचा निरोप घेतला. एकाने गळफास, तर दुसऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली.

शहरी भागातील आतषबाजीचा दणदणाट आणि लख्ख दिव्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बळीराजाच्या झोपड्यांमध्ये मात्र निःशब्द हुंदके ऐकायला आले. पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. या ‘अस्मानी’ संकटानंतर जलसंपदा विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे महापुराची ‘सुलतानी’ आली. तब्बल ९२ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. अडीच लाख एकर क्षेत्रावरील जिरायती तसेच बागायती पिके भुईसपाट झाली. काही मंत्र्यांनी बांधांवरुन तर काहींनी ट्रॅक्टरवर बसून पाहणी करत फोटोबाजी केली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिवाळीच्या अगोदर मदत देऊ !’ असा शब्द दिला. त्यामुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना किमान सण तरी साजरा करता येईल, असा दिलासा मिळाला.

पाडव्याच्या रात्री घेतला गळफास

दिवाळी आली, पण सरकारची मदत काही मिळाली नाही. लक्ष्मीपूजनाला घरच्या लक्ष्मीला नवीन साडी खरेदी करता आली नाही. पहिल्यांदाच लेकरं फटाक्यांविना घरात बसलेली. अशा विषण्ण परिस्थितीत खादगाव (ता. पैठण) येथील शेतकरी रामनाथ विश्वनाथ तानवडे यांनी पाडव्याच्या रात्री २२ रोजी शेतातच गळफास घेतला. सकाळी मुलगा केशव तानवडे शेतात गेला तेव्हा वडील झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसले. अतिवृष्टीत त्यांचे गट क्रमांक २२० मधील डाळींब, कांदा, कपाशी व तुरीचे पीक भुईसपाट झाले.

दीपावलीच्या पूर्वसंध्येला घेतला जगाचा निरोप

दीपावलीच्या पूर्वसंध्येला १९ रोजी तुपेवाडी येथील नामदेव लालसिंग राठोड या शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या गट क्रमांक ७४ मध्ये अवघी २ एकर शेतजमीन आहे. त्यावरच ते कुटुंबाची गुजराण करतात. अतिवृष्टीत पिकांची हानी, बँकांचे कर्ज, येऊन ठेपलेली दिवाळी अन् पदरात न पडलेली सरकारची नुकसान भरपाई. यामुळे व्यथित होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. विषारी औषध पिऊन त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार ज्योती पवार यांनी आदेश दिल्यानुसार महसूल प्रशासनाच्या वतीने या दोन्ही प्रकरणांचे पंचनामे करण्यात आले. तलाठी वाबळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर
सध्या बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्ष प्रचारात रंगले आहेत.  अशातच मोकामा विधानसभा मतदारसंघातून अनंत सिंह ही जोरदार प्रचार...
महाराष्ट्राच्या जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही; संजय राऊत यांचे विधान, 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा निघणार
1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा, डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार
शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र, त्यांचा मालक दिल्लीत असल्यानं त्यांना वारंवार जावं लागतं; संजय राऊत यांचा हल्लाबोल
satara News – राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली; गृहखाते फेल
हे करून पहा… हॉटेलसारखी तडका डाळ घरी करा
साखर आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना वजनकाट्यांच्या तपासणीसाठी भरारी पथके