भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी; निर्णयाकडे देशभरातील प्राणीप्रेमींचे लक्ष

भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी; निर्णयाकडे देशभरातील प्राणीप्रेमींचे लक्ष

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात दिलेल्या निर्णयावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नंतर न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात आधीच्या निर्णयात सुधारणा केली. भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवता येणार नाही, नसबंदी हाच एकमेव उपाय आहे, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्याच पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी, 27 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनावणीमध्ये राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरी त्या प्रकरणात न्यायालय इतर राज्यांबाबतही महत्वपूर्ण भूमिका घेऊ शकते. त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे देशभरातील प्राणीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालय 27 ऑक्टोबर रोजी भटक्या कुत्र्यांशी संबंधित सुमोटो याचिकेवर सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने 22 ऑगस्ट रोजी भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची व्याप्ती राजधानी दिल्लीच्या हद्दीबाहेर वाढवली होती. या प्रकरणात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या सूचीनुसार, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांचे विशेष खंडपीठ भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची सुनावणी घेणार आहे. सुमोटो याचिकेसह चार स्वतंत्र याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 22 ऑगस्ट रोजी एक आदेश दिला होता. त्यावेळी दिल्ली-एनसीआरमध्ये लसीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांना सोडण्यास मनाई करणाऱ्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा केली होती. नसबंदी केल्यानंतरच कुत्र्यांना बाहेर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुर्नूलनंतर रांचीत बसमध्ये अग्नितांडव, 40 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले कुर्नूलनंतर रांचीत बसमध्ये अग्नितांडव, 40 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले
कुर्नूलमधील बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच झारखंडमधील रांची येथे बसला आग लागली. शनिवारी संध्याकाळी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग...
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू; 13 जण जखमी
संपूर्ण जीवनात महिला किती किलो लिपस्टीक खातात ? जाणून बसेल धक्का
भारतात श्वास घेणंही कठीण, प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षांत 38 लाख जणांचा मृत्यू
एमडी होण्याचे स्वप्न भंगले… शैक्षणिक कर्जही फिटले नाही; आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
औषध कंपन्यांनी भाजपला ९४५ कोटी रुपयांची दिली देणगी, सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल दिग्विजय सिंह यांचा दावा
भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी; निर्णयाकडे देशभरातील प्राणीप्रेमींचे लक्ष