मच्छीमार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य, मनुष्यबळ कमी असल्याचे नगरपरिषदेकडून कारण

मच्छीमार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य, मनुष्यबळ कमी असल्याचे नगरपरिषदेकडून कारण

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील मच्छीमार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नाल्यात साचलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि सांडपाणी यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे.

नगर परिषदेचा आरोग्य विभाग झोपेचं सोंग घेत आहे, अशी तीव्र टीका नागरिकांनी केली आहे. वारंवार लेखी आणि तोंडी मागण्या करूनही नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे.

या संदर्भात माजी नगरसेवक विकास पाटील यांनी नगर परिषद प्रशासनाकडे मच्छीमार्केट येथील पऱ्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली. मात्र, नगर परिषदेने “मनुष्यबळ उपलब्ध नाही” असे सांगून ती मागणी थंडपणे फेटाळल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले
हरिद्वार स्थित पतंजली वेलनेस लोकांना नवे आयुष्य देत आहे. मोठ्या संख्येने विविध रोगांनी आजारी असलेल्यांना नवीन आयुष्य मिळत आहे. अशा...
केन विल्यम्सनचे IPL मध्ये पुनरागमन, लखनऊ सुपर जायंट्स सोबत बुद्धिचा डाव टाकणार
गुजरातच्या मंत्रिमंडळातली सर्व मंत्र्यांचे राजीनामे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपुर्वी भाजपचा मोठा निर्णय
मी तर कोंबडी चोर, समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी नाकारली Y दर्जाची सुरक्षा
Nestlé चा मोठा निर्णय; 16 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं…! 50 वर्षांचा गायक 16 वर्षांनी लहान गायिकेच्या प्रेमात, महिना अखेरीस उडणार लग्नाचा बार
Video – अन्यथा इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा – उद्धव ठाकरे