देशात स्लो ट्रॅव्हेलचा ट्रेंड, तीन कोटी पर्यटकांचा परदेश दौरा; अबू धाबी-व्हिएतनामला पसंती

देशात स्लो ट्रॅव्हेलचा ट्रेंड, तीन कोटी  पर्यटकांचा परदेश दौरा; अबू धाबी-व्हिएतनामला पसंती

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या इंडिया टुरिझम डेटा कम्पेंडियम अहवालानुसार, हिंदुस्थानात थांबून प्रवास करण्याचा ट्रेंड आला आहे. कमी वेळात अनेक ठिकाणी भेट देण्याऐवजी पर्यटक आता एका विशिष्ट ठिकाणी जास्त वेळ घालवत आहेत, जेणेकरून त्यांना स्थानिक जीवन, संस्कृती आणि अनुभवांचा चांगला अनुभव घेता येईल.

अहवालातून असे दिसून आले आहे की, 2024 मध्ये 3.09 कोटी हिंदुस्थानी परदेशात गेले आणि परदेशात राहण्याचा सरासरी कालावधीही 50 दिवसांपेक्षा जास्त झाला आहे. मध्य पूर्वेला भेट देणाऱ्या हिंदुस्थानींचे प्रमाण एका वर्षात 33 टक्क्यांवरून 36 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. अबू धाबी आणि हनोई ही पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत.

थायलंड सुट्टीसाठीचे पहिले ठिकाण

 2024 मध्ये 42.52 टक्के हिंदुस्थानींनी व्हेकेशन घालवण्यासाठी परदेशात प्रवास केला. 92.9 टक्के हिंदुस्थानींनी सुट्टी घालवण्यासाठी थायलंडला पसंती दिली. 91.6 टक्के हिंदुस्थानींनी व्हिएतनामला पसंती दिली.

यूएईमधील अबू धाबी, व्हिएतनाममधील हनोई आणि इंडोनेशियातील बाली हे हिंदुस्थानच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले.
टॉप 10 देशांव्यतिरिक्त, जवळ जवळ 51 लाख हिंदुस्थानींनी न्यूझीलंड, पोर्तुगाल, पोलंड आणि उझबेकिस्तानसह नवीन ठिकाणी प्रवास केला.

अहवालानुसार, 2024 मध्ये टॉप-10 डेस्टिनेशन देशांमध्ये हिंदुस्थानींनी केलेल्या एकूण परदेश प्रवासात 71.2 टक्के वाटा होता, जो 2023 मध्ये गेल्या वर्षी 74.2 टक्के होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या
हिंदू धर्मात अन्नाला देवाचे रूप मानले जाते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हटलं जातं. त्याला पाय लागला किंवा एखादा भाताचा कण देखीला...
महिनाभर भात सोडल्याने खरंच वजन कमी होते का? शरीरात काय बदल दिसतात?
मुंबई गिळायाचा प्रयत्न करणाऱ्या अ‍ॅनाकोंडाचं पोट फाडून बाहेर येईन; निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे मोदी, शहांवर बरसले
निवडणूक मतदार यादीत गडबड, आदित्य ठाकरेंनी मांडली वरळी मतदारसंघातील बोगस मतदार आकडेवारी
ट्रम्प लोकांचा आवाज दाबून त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, जो बायडेन यांची टीका
फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? 90% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या, नंतर फळे खरेदी करताना तुम्हीही चेक कराल स्टिकर
भाजपच्या बॅनरवर अमित शहा लोहपुरुष ! रोहीत पवार यांनी केली टीका