मुंबई-गोवा महामार्गावरील वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष, 16 वर्षांत केवळ 20 टक्केच वृक्ष लागवड

मुंबई-गोवा महामार्गावरील वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष, 16 वर्षांत केवळ 20 टक्केच वृक्ष लागवड

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना 100 ते 200 वर्षांपूर्वीच्या वड आणि पिंपळ यासह जांभूळ, आकेशिया अशा सावली देणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड झाली. एकेका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लावण्याचा नियम आहे. मात्र, गेल्या 16 वर्षांत चौपदरीकरणाचे काम 85 टक्के पूर्ण झाले असताना वृक्ष लागवडीचा वेग 20 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील प्रवास हा भकास झाला आहे, तर निवाऱ्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांनी लागवडीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये दुतर्फा 88 हजार 81 आणि मध्यभागी 11 हजार 352, असे एकूण 99 हजार 433 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी दुतर्फा 4 हजार 224 आणि मध्यभागी 4 हजार 967, अशी एकूण 9 हजार 191 वृक्ष लागवड झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 99 हजार 433 रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी केवळ 9 हजार 191 रोपांची लागवड झाली आहे.

सरासरी 14.2 टक्के कार्यवाही झालेली आहे. वृक्ष लागवडीचे नियोजन पूर्णपणे चुकत आहे. उन्हाळ्यात वृक्ष लागवड करून ती जगवण्यासाठी टँकरने पाणी दिले जाते. सध्या पाऊस परतीच्या मार्गावर आहे, जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे आता वृक्ष लागवड झाली तर त्या झाडांना अतिरिक्त पाणी देण्याची गरज लागणार नाही. कशेडीपासून परशुराम घाटापर्यंत उन्हाळ्यात वृक्ष लागवड झाली होती. त्याला पुरेसे पाणी मिळाले नाही, त्यामुळे झाडे सुकली. काही झाडे उनाड गुरांनी तोडून टाकली. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर दरम्यानही हीच अवस्था आहे. रत्नागिरी-संगमेश्वर या ठिकाणी दुभाजकामध्ये अजूनही वृक्ष लागवड झालेली नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर वृक्ष लागवड करण्यासाठी ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने नर्सरीमध्ये रोपे तयार केली आहेत. लहान झाडे टिकत नाहीत, ती लवकर मरतात. काही झाडे सुकली आहेत, ही वस्तुस्थिती असली तरीही तिथे नव्याने पुन्हा लागवड करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही दिवाळीनंतर सुरू होणार आहे. रस्त्याच्या मध्यभागी आणि दुतर्फा लागवड केलेल्या झाडांना पाणी देणे आणि त्यांचे संगोपन करणे ही जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.                                                                                     राजेंद्र कुळकर्णी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या
हिंदू धर्मात अन्नाला देवाचे रूप मानले जाते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हटलं जातं. त्याला पाय लागला किंवा एखादा भाताचा कण देखीला...
महिनाभर भात सोडल्याने खरंच वजन कमी होते का? शरीरात काय बदल दिसतात?
मुंबई गिळायाचा प्रयत्न करणाऱ्या अ‍ॅनाकोंडाचं पोट फाडून बाहेर येईन; निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे मोदी, शहांवर बरसले
निवडणूक मतदार यादीत गडबड, आदित्य ठाकरेंनी मांडली वरळी मतदारसंघातील बोगस मतदार आकडेवारी
ट्रम्प लोकांचा आवाज दाबून त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, जो बायडेन यांची टीका
फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? 90% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या, नंतर फळे खरेदी करताना तुम्हीही चेक कराल स्टिकर
भाजपच्या बॅनरवर अमित शहा लोहपुरुष ! रोहीत पवार यांनी केली टीका