सत्तेत आल्यानंतर अदानी, अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण, काँग्रेस नेत्यांचा निर्धार

सत्तेत आल्यानंतर अदानी, अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण, काँग्रेस नेत्यांचा निर्धार

ईस्ट इंडिया कंपनीची संपत्ती ब्रिटिश सरकारपेक्षा प्रचंड वाढल्याने ब्रिटिश सरकारने ती कंपनीच ताब्यात घेतली होती. लष्कराला तेल देण्यास नकार दिल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय घेतला होता तसेच बँकांचेही राष्ट्रीयीकरणही केले. आता 2029 ला काँग्रेस सत्तेत आल्यानंतर अदानी व अंबानीच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करू, असा दृढनिश्चय काँग्रेस नेत्यांनी आज केला.

टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत घर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गरीबांना परवडणारी घरे देण्याऐवजी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार अदानी आणि अंबानींना मोक्याच्या जमिनी आंदण देत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. त्यामुळे गरीबांच्या कल्याणासाठी या उद्योगपतींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करायला हवे, असे सपकाळ म्हणाले.

परवडणाऱ्या घरांसाठी काम करणे गरजेचे

मुंबईसारख्या शहरात घर खरेदी करणे सर्वसामान्य लोकांच्या हाताबाहेर गेले आहे, सरकार मुंबईतील जमिनी अदानीला विकत आहे आणि सर्वसामान्य जनतेला परवडणारी घरे मिळाली पाहिजे यासाठी काम करणे गरजेचे आहे. घराचे छप्पर असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहेत, घरांसाठी तुम्ही भूमिका ठरवा काँग्रेस तुमच्या पाठीशी असेल, असा विश्वासही सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केला. माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ranji Trophy – पृथ्वी शॉचं वादळ, चंदीगडला तडाखा; 140 च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं द्विशतक Ranji Trophy – पृथ्वी शॉचं वादळ, चंदीगडला तडाखा; 140 च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं द्विशतक
टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ याने रणजी करंडकात वादळी खेळी केली आहे. चंदीगडविरुद्ध पृथ्वी शॉ याने 140 च्या स्ट्राईक रेटने...
AI च्या माध्यमातून भावाचे आणि बहिणींचे बनवले अश्लिल फोटो आणि व्हिडीओ; ब्लॅकमेलिंगला कंटाळून 19 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
देशाची प्रतिमा मलिन होत आहे….भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
उत्तम आरोग्यासाठी रोज एक वाटी दही आहे खूप गरजेचे, वाचा
लग्नात सुंदर दिसण्यासाठी करून बघा हे खास फेशियल
वजन कमी करण्यासाठी या भाकरीचा आहारात समावेश करायलाच हवा, वाचा
फलटण प्रकरणात माजी खासदाराला CM कडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच! – हर्षवर्धन सपकाळ