हेवेदावे सोडून शेतकर्‍यांना मदत करा, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

हेवेदावे सोडून शेतकर्‍यांना मदत करा, उद्धव ठाकरे यांचे आवाहन

राज्यातील शेतकरी संकटात असताना ‘मी काय केले, तुम्ही काय केले’ हे बघण्याची वेळ नाही. सर्व हेवेदावे सोडून अगोदग माझ्या शेतकर्‍याला भरीव मदत करा, पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजारांचा मदत मिळाली पाहिजे, होय मी आरशात पाहतो, तुम्ही शेतकर्‍यांकडे पहा, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.

अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हंबरडा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते शिवसेना भवनाचे उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १० रोजी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी स्वत: आरशात बघावे, अशी टीका केली होती. कर्जमाफीचा शेतकर्‍यांना नाद लागला असल्याचे संवेदनशील वक्तव्य सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. नाद कशाशी संबंधित असतो हे त्यांना ठाऊक असले पाहिजे. त्यांची मानसिक स्थिती तपासण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले. असे लोक लोकांचे काय भले करणार, असा प्रश्नही त्यांनी केला. आज काढलेला हंबरडा मोर्चा नसून, इशारा मोर्चा आहे. त्यानंतरही शेतकर्‍यांचा आक्रोश सरकारला ऐकू गेला नाही तर राज ठाकरे आणि मी सोबत येऊ, असे ते म्हणाले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी होते, याची तपासणी करण्यासाठी शिवसैनिकांचे गावागावात दक्षता पथक नियुक्त केले जाणार आहे. हे पथक तपासणी करेल. मनरेगामधून हेक्टरी साडेतीन लाख मुख्यमंत्री कसे देणार, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
अहिल्यानगरमध्ये राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरातील दोन न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी नेमका किती मुद्देमाल लंपास केला...
छत्तीसगडच्या कांकेरमध्ये 21 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण, 18 शस्त्रे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द
मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे कुर्नुलचा अपघात, पोलिसांची माहिती
दिवाळीत पुणे बाजार समितीत टपर्‍यांचा पाऊस; बाजार समिती सचिवांचे वारंवार दुर्लक्ष, पंधरा दिवसांत दुसरी टपरी
Bihar Election – नाभिक, कुंभार आणि लोहार कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा
टायर फुटल्याने धावती एसी बस आगीच्या भक्ष्यस्थानी, 40 प्रवासी थोडक्यात बचावले
पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केलं, काय आहे कारण?