म्हशीला वाचवण्याच्या नादात भीषण अपघात, गाड्या एकमेकांना आदळून 4 जणांचा मृत्यू

म्हशीला वाचवण्याच्या नादात भीषण अपघात, गाड्या एकमेकांना आदळून 4 जणांचा मृत्यू

उदयपूर-अहमदाबाद महामार्गावरील ऋषभदेवजवळ शनिवारी रात्री भीषण अपघात घडला आहे. म्हशीला वाचवण्याच्या नादात टॅंकर, ट्रक, जीप आणि एक बोलेरो एकमेकांवर धडकून हा अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

हा अपघात शनिवारी रात्री उदयपूर-अहमदाबाद महामार्गावरील ऋषभदेवजवळ घडला. उदयपूरहून परतणारी बोलेरो म्हशीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये उलटली. बोलेरोमधील चारही प्रवासी बाहेर पडून दुभाजकावर उभे राहण्यात यशस्वी झाले, मात्र समोरून एक भरधाव ट्रेलर आला जो दुभाजकाला धडकला आणि त्या चौघांनाही चिरडले. धडक इतकी भीषण होती की मृतदेह ओळखता येत नव्हते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली आहेत. जखमींना ऋषभदेव रुग्णालयात नेण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नगरमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू नगरमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे भक्ष्याचा पाठलाग करत असताना एक बिबट्या रात्रीच्या अंधारात विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. पिंपळगाव निपाणी...
Latur News – बुधोडा येथे ट्रॅव्हल्स आणि सायकलचा भीषण अपघात, सायकलस्वाराचा जागीच मृत्यू
७ मिनिटांत ८५० कोटी रुपयांची चोरी, पॅरिसच्या लूव्र संग्रहालय प्रकरणात दोघांना अटक
मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अंबादास दानवे यांचा सवाल
मुंबईसह कोकण परिसरात 26 ते 30 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
Bihar Election : सत्तेत आल्यास वक्फ कायदा कचराकुंडीत फेकून देऊ – तेजस्वी यादव
राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह