डिजिटल युगात मुली सर्वात असुरक्षित, तंत्रज्ञान बनलं शोषणाचं साधन – सरन्यायाधीश गवई

डिजिटल युगात मुली सर्वात असुरक्षित, तंत्रज्ञान बनलं शोषणाचं साधन – सरन्यायाधीश गवई

डिजिटल युगात मुली सर्वात असुरक्षित आहेत, तंत्रज्ञान शोषणाचे साधन बनलं आहे, असं सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या बाल न्याय समिती आणि युनिसेफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या ”सेफगार्डिंग द गर्ल चाईल्ड’ या राष्ट्रीय परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, “ऑनलाइन छळ, सायबरबुलिंग, डिजिटल स्टॉकिंग, वैयक्तिक डेटाचा गैरवापर आणि डीपफेक फोटो आज मुलींसाठी चिंतेचं मोठं कारण बनल्या आहेत. या धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी, पोलीस आणि अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांना समजूतदारपणा आणि संवेदनशीलतेनं हाताळण्यासाठी विशेषतः प्रशिक्षित करणं आवश्यक आहे.”

गवई म्हणाले की, “संवैधानिक गॅरंटी असूनही देशातील अनेक मुलींना अजूनही मूलभूत हक्क आणि सन्मान नाकारला जातो. ही परिस्थिती त्यांना लैंगिक शोषण, मानवी तस्करी, बालविवाह आणि भेदभावाच्या परिस्थितीत ढकलते.” ते म्हणाले, “डिजिटल युगात धोके आता भौतिक क्षेत्राच्या पलीकडे जाऊन व्हर्चुअल जगात पोहोचले आहेत. तंत्रज्ञान संधी देत ​​असताना, ते शोषणाच्या नवीन प्रकारांचे साधन देखील बनत आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रिल्ससाठी बाईकवर करत होता स्टंट, नंतर असे काही घडले आणि जीवावर बेतले रिल्ससाठी बाईकवर करत होता स्टंट, नंतर असे काही घडले आणि जीवावर बेतले
रिल्स बनविण्याचा ट्रेण्ड जीवघेणा ठरत आहे. काहीतरी हटके करण्यासाठी तरुणाई जीवघेणे स्टंट करत आहे. अशातच हिमाचल प्रदेशमधील एका 22 वर्षीय...
हिंदुस्थाननं रशियाकडून तेल आयात पूर्णपणे थांबवलीय! डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार
Satara doctor suicide case – ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने केलेला संस्थात्मक खून; राहुल गांधींचा घणाघात
Dapoli News – ‘मार्केट डे’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उमटली लघुउद्योगाची जाणीव’
अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर
महाराष्ट्राच्या जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही; संजय राऊत यांचे विधान, 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा निघणार
1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा, डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार