सरकारला 15 रुपये पाठवून ऊसदरकपातीचा निषेध

सरकारला 15 रुपये पाठवून ऊसदरकपातीचा निषेध

‘मुख्यमंत्री सहायता निधी’ याकरिता १७ रुपये ५० पैसे प्रतिटन गाळप झालेल्या उसावर कारखान्यांकडून दरवर्षी कपात करून घेतात. यंदा अतिरिक्त पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी अतिरिक्त प्रतिटन १० रुपये गाळप झालेल्या उसातून कपात करणार आहे. अशा प्रकारे एकूण २७ रुपये ५० पैसे प्रतिटन गाळप झालेल्या उसातून वसूल होणार आहेत.

या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज साखर आयुक्तालयामध्ये सरकारला १५ रुपये देऊन तीव्र विरोध केला. यापूर्वी राज्य सरकार हे साखर संघ, मुख्यमंत्री सहायता निधी याकरिता १७ रुपये ५० पैसे प्रतिटन गाळप झालेल्या उसावर कारखान्यांकडून दरवर्षी कपात करून घेतात. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, याकरिता कारखान्यांकडून अतिरिक्त प्रतिटन १० रुपये गाळप झालेल्या उसातून करणार आहे.

अशा प्रकारे एकूण २७ रुपये ५० पैसे प्रतिटन गाळप झालेल्या उसातून वसूल केले जातील. सरकारने १० रुपये प्रतिटनाचा जो बोजा टाकला आहे, तो तत्काळ रद्द व्हावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी केली. संघटनेचे पदाधिकारी योगेश पांडे, स्वस्तिक पाटील, राजू तळसंगी यावेळी उपस्थित होते. योगेश पांडे म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्य सरकारच्या अशा तुघलकी निर्णयाचा तीव्र विरोध करते. दरवर्षी साखर उद्योगाकडून सरकारला तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा कररूपाने महसूल दिला जातो. या अतिरिक्त १० रुपये प्रतिटन कपात करण्यास तीव्र विरोध आहे.

सरकारचा शेतकऱ्यांवर लादलेला हा भार म्हणजे शेतकऱ्यांचे धोतर ओढून त्याला उघडे करणे आणि ते धोतर शेतकऱ्यांच्या डोक्यावर फेटा म्हणून बांधणे आणि आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो म्हणत बोंबा मारणे, असा प्रकार आहे,’ असे ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – सर्वपक्षीय शिष्टमंडळ पुन्हा निवडणूक आयुक्तांना भेटले Photo – सर्वपक्षीय शिष्टमंडळ पुन्हा निवडणूक आयुक्तांना भेटले
महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज पुन्हा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची...
दररोज आवळा आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
मलेरिया होऊन गेल्यानंतर आहारात काय बदल करणे गरजेचे आहे, वाचा
मतदार यादीतील घोळ सुधारत नाहीत, तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये; उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका
निवडणुका लढवणाऱ्या राजकीय पक्षांनाच मतदार याद्या दाखवत नसतील तर हाच पहिला घोळ, राज ठाकरे यांनी आयोगाला धरलं धारेवर
Sangameshwar News – मद्यधुंद मुलाने आईच्या डोक्यात लाकूड मारून केले गंभीर जखमी
Breast Cancer Symptoms: स्तन किंवा काखेत गाठ दिसतेय? नका करु दुर्लक्ष, असू शकते कॅन्सरची सुरवात, लक्षणं आणि उपचार घ्या जाणून