पांढरे सोने फुलले; कमी भावामुळे शेतकऱ्यांवर संकट

पांढरे सोने फुलले; कमी भावामुळे शेतकऱ्यांवर संकट

परतीचा पाऊस लांबल्याने कापूस उत्पादक शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पाऊस ओसरल्यानंतर गेल्या सात–आठ दिवसांपासून पडणाऱया कडक उन्हामुळे शेतात ‘पांढरे सोने’ (कापूस) फुलू लागला असून, वेचणीसाठी शेतकऱयांनी लगबग सुरू केली आहे. दरम्यान, कापसाला बाजारात कमी भाव मिळत असल्याने आणि वेचणीसाठी प्रतिकिलो 12 ते 15 रुपये मजुरी दिली, तरी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

राहुरी तालुक्यातील बहुतेक शेतकऱयांनी यंदा कापूस पिकाला प्राधान्य दिले होते. मात्र, परतीच्या पावसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हजेरी लावल्याने अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले. मान्सून उशिरा सुरू झाल्याने पिके करपण्याची वेळ आली होती; पण नंतर झालेल्या पावसाने काहीशी आशा निर्माण झाली. तथापि, परतीच्या पावसाने पुन्हा निराशा केली. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, चारा, घास, कडवळ आदी पिकांचेही नुकसान झाले आहे.

कडक उन्हात पुन्हा फुलला कापूस

गेल्या आठ–दहा दिवसांपासून पडणाऱया कडक उन्हामुळे शेतातील कापसाची झाडे पुन्हा फुलू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी मिळेल, त्या भावात मजूर शोधून वेचणीसाठी धडपड करत आहेत. दिवाळी जवळ आल्याने कापूस विक्री करूनच सण साजरा करण्याची वेळ अनेक शेतकऱयांवर आली असून, त्यातून मजुरांसाठीची धावपळ सुरू आहे.

कमी दर, वाढलेला खर्च

सुरुवातीपासूनच कापसाला समाधानकारक भाव मिळत नाही. व्यापाऱयांनी सुरुवातीला ‘कापूस भिजलेला आहे’ या कारणावरून क्विंटलमागे 4,500 रुपये भाव दिला. नंतर भाव थोडा वाढला, असला तरी केवळ 6 हजार ते 6,500 रुपये क्विंटल इतकाच आहे. दुसरीकडे, वेचणीचा खर्च प्रचंड वाढला असून, प्रतिकिलो दर 5 ते 7 रुपयांवरून 12 ते 15 रुपयांपर्यंत गेला आहे. तरीदेखील मजूर मिळणे कठीण झाले आहे. कापसाचे पीक उभे करण्यासाठी शेतकऱयांनी बियाणे, रासायनिक खते, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, सध्याच्या बाजारभावात तो खर्च निघणेही कठीण बनले आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचे पीक शेतकऱयांसाठी तोटय़ात गेलेले दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;