दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल – मंत्री चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल, असा अंदाज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे. दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागा. येणाऱया दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा, असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्यात बोलताना दिला.
2019 साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले. निवडणूक ही फास्ट ट्रेनप्रमाणे आहे. प्लॅटफॉर्मवर जो राहील तो राहील, मात्र नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबरच नशीबदेखील लागते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे, मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. अजित पवार गट आणि शिंदे गट मागत असलेल्या जागेवर भाजपकडे चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List