राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर आशीष शेलार यांची टीका, जय शहा यांनी योग्य केले!

राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर आशीष शेलार यांची टीका, जय शहा यांनी योग्य केले!

पहलगाम हल्ल्याची जखम भळभळत असताना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास हिरवा कंदील दाखवणाऱ्या मोदी सरकारला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून फटकारले. गृहमंत्री अमित शहा आणि आयसीसीचे चेअरमन जय शहा यांच्यावर राज यांचा कुंचला चालला. हे व्यंगचित्र भाजपला खटकले असून मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी त्यावर टीका करत जय शहा कसे योग्य आहेत, हे सांगितले.

‘अरे बाबांनो उठा, आपण जिंकलो, पाकिस्तान हरले’ असे गृहमंत्री आणि आयसीसी हे पहलगाम हल्ल्यात बळी गेलेत त्यांना सांगत असल्याचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. ‘नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं’, असा सवाल राज यांनी विचारला आहे. त्यावर पत्रकारांनी विचारले असता, कलेमध्ये राजकारण असेल तर त्याला राजकीय उत्तर द्यावं लागेल, असे शेलार म्हणाले. जय शहा नावाची भीती सर्वांना वाटते आहे का? त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये भारताचं नाव उंचावले. देशहिताचे काम केले. त्यामुळे त्यांच्यावर असं व्यंग करणं अयोग्य आहे, असे शेलार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;