Ratnagiri News – हातखंबा येथे भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवले; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Ratnagiri News – हातखंबा येथे भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवले; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका 20 वर्षीय तरुणाचा नाहक बळी गेला आहे. तसेच अन्य एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील हायस्कुलच्या तीव्र उतारावर भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रेलर चालकाचे गाडीवरीन नियंत्रन सुटले आणि त्याने 3 दुचाकी आणि दोन कारला धडक दिली. या धडकेच चारजण किरकोळ जखमी झाले आहे. मात्र शिवम रवींद्र गोताड (20) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून निशांत कळंबटे (20) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हे दोघेही रत्नागिरी आयटीआय येथे शिक्षण घेत होते. बुधवारी (17 सप्टेंबर 2025) अपघाताच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून झरेवाडीकडे जात होते. मात्र, याच दरम्यान हतखंबा येथील हायस्कुलसमोर ते आले असता मागून आलेल्या ट्रेलरने त्यांना जोराची धडक दिली. या भयंकर अपघातात शिवम जागीच ठारा झाला तर निशांतवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपस्थितांनी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहूतक सुरळीत करत एक मार्गे सुरू केली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यात पिठात किडे होण्यामुळे वैतागला आहात? पिठात ही गोष्ट ठेवा,  काही मिनिटांतच समस्या सुटेल पावसाळ्यात पिठात किडे होण्यामुळे वैतागला आहात? पिठात ही गोष्ट ठेवा, काही मिनिटांतच समस्या सुटेल
पावसाळ्यात शक्यतो कोणत्याही पिठात किडे होण्याची समस्या समोर येतेच. किड्यांचं प्रमाण पिठात एवढ वाढतं कि ते पीठ शेवटी फेकून देण्याव्यतिरिक्त...
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक
स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा, एक कोटीची रोकड आणि 20 किलो सोने लुटून दरोडेखोर पसार
IND W Vs AUS W – गोलंदाजांची कमाल; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला, मालिका बरोबरीत
Asia Cup 2025 – सूर्यकुमार यादवला फाईन लावा, मॅच रेफरीवर कारवाई करा…; पाकिस्तानच्या मागण्यांना ICC ची केराची टोपली
वर्गात गैरवर्तन केले म्हणून शिक्षिकेने डोक्यात स्टीलचा डबा मारला, विद्यार्थिनीच्या डोक्याला फ्रॅक्चर
चंद्रपूर मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले