राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या! वडेट्टीवार यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या! वडेट्टीवार यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे.

राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.सोयाबीन, मका, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी. तसेच बँकेकडून शेतकऱ्यांची होणारी वसुली थांबवावी, पिक विमा कंपन्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे बळीराजा आस लावून बसला होता की त्याला काही मदत मिळेल पण या बैठकीत देखील शेतकऱ्यांसाठी काही निर्णय झाला नाही.शेतकरी निराश झाला आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. राज्यातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अस वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्ही प्रेग्नंट असाल तर या 5 गोष्टी कधीही करू नका; हानी पोहोचवू शकते तुम्ही प्रेग्नंट असाल तर या 5 गोष्टी कधीही करू नका; हानी पोहोचवू शकते
महिलांना त्यांच्या प्रेग्नसीच्या काळात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आराम, आहार हे तर गरजेच असतच पण सोबतच काही गोष्टी टाळायच्याही...
पंतप्रधान मोदींच्या फिटनेसचे रहस्य ही खास भाजी; जी प्रत्येकाच्या घरात बनते, म्हणून वयाच्या 75 व्या वर्षीही इतके तंदुरुस्त
रेती वाहून नेणाऱ्या ट्रकची कारला धडक, अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
केरळमध्ये हाय अलर्ट, ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ने घेतला 19 जणांचा जीव
जम्मू-कश्मीर आपलंच असेल! पहलगाम हल्ल्याच्या कटातील सूत्रधाराची हिंदुस्थानला धमकी
Asia Cup 2025 – UAE सोबत खेळण्यास नकार, पाकिस्तान आशिया चषकातून बाहेर!
Ratnagiri News – साडवलीतील बिबट्या अखेर अडकला वनविभागाच्या जाळ्यात, मोठ्या शिताफीने घेतलं ताब्यात