ज्वेलर्सकडून पैसे उकळले, जीआरपीच्या तीन पोलिसांना अटकपूर्व जामीन

ज्वेलर्सकडून पैसे उकळले, जीआरपीच्या तीन पोलिसांना अटकपूर्व जामीन

राजस्थानमधील एका ज्वेलर्सला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात धमकी, मारहाण आणि पैसे उकळल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जीआरपीच्या तीन पोलिसांचा मुंबई उच्च न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला.

मुंबईहून राजस्थानला जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या बॅगांची एका पोलीस अधिकाऱ्याने तपासणसी केली. त्यावेळी बॅगेत 31 हजार 900 रुपये रोख आणि 14 ग्रॅम सोन्याचा तुकडा आढळले. रोख रकमेची चौकशी करण्यासाठी एका खोलीत नेण्यात आले आणि त्यांना तुरुंगवासाची धमकी देण्यात आली. इतकेच नव्हे, तर कागदावर सही करण्यास भाग पाडण्यात आले, याप्रकरणी जीआरपीच्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी ऍड. अनिकेत निकम यांच्यामार्फत हायकोर्टात अर्ज दाखल केला, त्यावर न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ITR मुदतवाढीचे वृत्त फेटाळले नंतर दिली एक दिवसाची मुदतवाढ; आयकर विभागाची माहिती ITR मुदतवाढीचे वृत्त फेटाळले नंतर दिली एक दिवसाची मुदतवाढ; आयकर विभागाची माहिती
आयकर रिटन्स भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर होती. याआधी 31 जुलैची मुदत वाढवून ती 15 सप्टेंबर करण्यात आली होती. मात्र,...
देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे ढगफुटी, 100 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
ज्वेलर्सकडून पैसे उकळले, जीआरपीच्या तीन पोलिसांना अटकपूर्व जामीन
15 वर्षांनंतर कामाठीपुऱ्यातील कुटुंबाला न्याय, अवघ्या चार तासांत म्हाडाच्या मास्टर लिस्टसाठी झाले पात्र
आमच्या घरांचा प्रश्न सोडवा, अन्यथा मुंबईतच झोपड्या बांधू; गिरणी कामगारांचा सरकारला इशारा
आचार्य देवव्रत यांनी घेतली राज्यपाल पदाची शपथ