महाराष्ट्रावर 90 दिवसांत 24 हजार कोटींचं कर्ज; भाऊ, दादा, मिंधेंनी राज्याचं दिवाळं काढलं

महाराष्ट्रावर 90 दिवसांत 24 हजार कोटींचं कर्ज; भाऊ, दादा, मिंधेंनी राज्याचं दिवाळं काढलं

देवाभाऊ, दादा, मिंधेंनी राज्याचं दिवाळं काढलं आहे. लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडल्यामुळे सरकारला सतत कर्ज काढावे लागत आहे. लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी मागील 90 दिवसांत 24 हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलावे लागले. पुढील काही दिवसांत आर्थिक स्थिती अधिकच खालावत जाणार असून या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा आकडा 9 हजार कोटींवर जाणार आहे.

राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत वित्त विभागाकडून आरटीआय अतंर्गत माहिती प्राप्त झाली. त्यातील आकडेवारीनुसार धक्कादायक आर्थिक परिस्थिती पुढे आली आहे. राज्य सरकारने 2025-26 या नव्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात एकूण 34 हजार 589 कोटी 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले. तर त्याच महिन्यात 21 हजार 956 कोटी रुपयांचे कर्ज फेडले. मे महिन्यात सरकारने 19 हजार 173 कोटी रुपयांचे कर्ज उचलले आणि 19 हजार 254 कोटी रुपयांची कर्जफेड केली. तर जून महिन्यात सरकारने 22 हजार 725 कोटींचे कर्ज घेतले आणि त्याच महिन्यात 12 हजार 262 कोटी रुपयांचे कर्ज फेडले. तीन महिन्यांतील कर्जफेडीची एकूण रक्कम 52 हजार 472 कोटी रुपये इतकी आहे. राज्य सरकारने कर्जाची रक्कम सात ते सव्वासात टक्के व्याज दराने खुल्या बाजारातून रोख्यांच्या माध्यमातून उभारली. राज्य सरकार रोख्यांशिवाय नाबार्ड आणि नॅशनल हौसिंग बँकेकडून सव्वाचार टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध होत असल्याची माहिती वित्त विभागाने दिली आहे.

कर्जाचा डोंगर वाढतोय

  • आर्थिक वर्ष निव्वळ कर्ज (कोटी रुपये)
  • 22022-23 6 लाख 29 हजार 235
  • 2023-24 7 लाख 18 हजार 507
  • 204-25 8 लाख 39 हजार 275

2025-26 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा आकडा 9 लाख 32 हजार 242 कोटींवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

व्याजाचा भार वाढला

दरम्यान, कर्जाच्या रक्कमेत वाढ होत असल्याने सरकारवरील व्याजाचा बोजा वाढत चालला आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात व्याजापोटी सरकारला 41 हजार 689 कोटी रुपये मोजावे लागले. 2023-24मध्ये 45 हजार 652 कोटी तर 2024-25 या आर्थिक वर्षात व्याज फेडण्यासाठी 54 हजार 687 कोटी रुपये द्यावे लागले. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारला एकूण कर्जावरील व्याजापोटी 64 हजार 659 कोटी रुपये द्यावे लागतील, असा अंदाज आहे.

9 महिन्यांत 99 हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारणार

राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 25 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. केंद्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला 1 लाख 46 हजार कोटी 687 लाख रुपये इतके कर्ज उभारण्यास परवानगी दिली आहे. यापैकी पहिल्या नऊ महिन्यांसाठी 99 हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार आहे. या कर्जापैकी 10 हजार कोटींचे कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हौसिंग बँकेकडून घेण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ITR मुदतवाढीचे वृत्त फेटाळले नंतर दिली एक दिवसाची मुदतवाढ; आयकर विभागाची माहिती ITR मुदतवाढीचे वृत्त फेटाळले नंतर दिली एक दिवसाची मुदतवाढ; आयकर विभागाची माहिती
आयकर रिटन्स भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर होती. याआधी 31 जुलैची मुदत वाढवून ती 15 सप्टेंबर करण्यात आली होती. मात्र,...
देहरादूनमधील सहस्त्रधारा येथे ढगफुटी, 100 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 16 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
ज्वेलर्सकडून पैसे उकळले, जीआरपीच्या तीन पोलिसांना अटकपूर्व जामीन
15 वर्षांनंतर कामाठीपुऱ्यातील कुटुंबाला न्याय, अवघ्या चार तासांत म्हाडाच्या मास्टर लिस्टसाठी झाले पात्र
आमच्या घरांचा प्रश्न सोडवा, अन्यथा मुंबईतच झोपड्या बांधू; गिरणी कामगारांचा सरकारला इशारा
आचार्य देवव्रत यांनी घेतली राज्यपाल पदाची शपथ